अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा राखले दिल्लीचे तख्त ….

Date:

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेत ‘कमळ’ फुलवण्याचं भाजपाचं २२ वर्षांपासूनचं स्वप्न पुन्हा एकदा ‘आप’च्या ‘हवे’त विरलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा करिष्मा आम आदमी पार्टीसाठी ‘खास’ ठरला असून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः ‘झाडू’न टाकलंय. ७० पैकी ६२ जागा ‘आप’ने जिंकल्यात आणि दिल्लीत ‘तिसरी बार, केजरीवाल सरकार’ आणून दाखवलंय. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात आपला 62 जागांवर स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र आपला 5 जागांवर नुकसान होत आहे. भाजप 8 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस सलग दुसऱ्यांदा निवडणुकीत आपले खाते उघडू शकले नाही. पटपडगंज मतदारसंघातून उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया 12 व्या फेरीपर्यंत पिछाडीवर होते. मात्र 13 व्या फेरीत त्यांनी विजय मिळवला आहे. आपल्या विजयानंतर ते म्हणाले की, भाजपने द्वेषाचे राजकारण केले. परंतु दिल्लीने काम करणाऱ्यांना निवडून दिले. भाजपने म्हटले की आम्ही दिल्लीचा जनादेश स्वीकारतो. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केजरीवाल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आणि सांगितले की आम्ही सकारात्मक विरोधाची भूमिका बजावू.

दिल्लीत सध्या आम आदमी पार्टीचे सरकार असून भाजपा 22 आणि काँग्रेस 7 वर्षांपासून सत्तेपासून दूर आहेत. दरम्यान आताचे निकालाचे कल पाहता भाजप आणि काँग्रेसला सत्तेसाठी पुढील 5 वर्षे वाट पाहावी लागणार असे चित्र दिसत आहे.

  • 12 व्या फेरीपर्यंत पिछाडीवर राहिलेले मनीष सिसोदिया 13 व्या फेरीनंतर वियजी. त्यांनी तिसऱ्यांदा आमदार झाल्याबाबत आनंद व्यक्त केला.
  • आम आदमी पार्टीचे उमेदवार राघव चड्ढा राजेंद्र नगर येथून तर आतिशी मर्लेना कालकाजी मतदारसंघातून विजयी.

निकालादिवशी दिल्ली सर्वात वेगवाग, 21 मिनिटात 70 जागांचे चित्र स्पष्ट झाले.

टपाल मतपत्रिकेची मोजणी केल्यानंतर मंगळवारी सकाळी टीव्ही चॅनेलच्या कलानुसार सुरुवातीच्या 15 मिनिटांत आपच्या विजयाची खात्री पटली. पुढील सात मिनिटांत म्हणजेच 8 वाजून 21 मिनिटाला 70 जागांवरील कल समोर आले आणि ‘आप’ने 50+ जागांवर आघाडी मिळवली.

प्रचारात भाजप आघाडीवर होते, मात्र आपचे ‘टीना’ फॅक्टर भारी पडले

14 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर 23 दिवसांत भाजपचे 100 नेते निवडणुकीच्या प्रचारात उतरले. शाह-मोदी सह 40 स्टार प्रचारकांनी प्रचार केला. 4500 कॉर्नर बैठका घेतल्या. अमित शाह अधिसूचनेच्या 25 दिवसांपूर्वीच प्रचाराला लागले होते. दुसरीकडे केजरीवाल यांनी 39 स्टार प्रचारक उतरवले. 3 मोठे रोड शो आणि छोट्या जनसभा घेतल्या मात्र आपचा प्रचार भाजपवर भारी पडल्याचे दिसते आहे.

भाजपने 2019 ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नावे लढली आणि 303 जागांवर विजय मिळवला. आपने यातून धडा घेतला. ज्याप्रमाणे भाजपने प्रचार केला होता की, मोदी शिवाय देशाला पर्याय नाही, त्याचप्रकारे आपने देखली दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचार केला की, केजरीवाल शिवाय कोणता पर्याय नाही. याला ‘टीना’ अर्थात देअर इज नो अल्टरनेटिव्ह (TINA) फॅक्टर म्हणतात.

भाजपने कलम 370 रद्द करण्याचे वचन पूर्ण केले, मात्र 4 पैकी 3 निवडणुकांत पराभव

भाजपने 1984 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. तेव्हा जम्मू-काश्मिरमध्ये कलम-370 रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. 5 वर्षांनंतर 1989 मध्ये अयोध्येत राम मंदिर निर्माण आणि यूनिफॉर्म सिव्हिल कोड भाजपच्या आश्वासनांमध्ये जोडले गेले. भाजपने दोन्ही आश्वासने पूर्ण केली आहेत. परंतु आश्वासने पूर्ण केल्यानंतर झालेल्या 4 पैकी 3 विधानसभा निवडणुकांत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी बाकावर बसावे लागले. हरियाणात जजपाच्या मदतीने सरकार स्थापन करावे लागले. तर झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.

एनडीएने दोन वर्षांत 7 राज्यांतील सत्ता गमावली

एनडीएने गेल्या दोन वर्षांत सात राज्यातील सत्ता गमावली. दिल्लीसह 12 राज्यांत सध्या भाजप विरोधी पक्षांचे सरकार आहे. सध्या एनडीएची केवळ 16 राज्यात सत्ता आहे. या राज्यांत 42% लोकसंख्या आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...