पुणे-राज्यातील ठाकरे सरकारला मी नवे नाव देत आहे, महाविश्वासघातकी आघाडी सरकार, असे म्हणत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहे, राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली, पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली असा आरोपही भाजप खासदार प्रकाश जावडेकरांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू सरकार असल्याचा घणाघात देखील जावडेकरांनी केला आहे.
जावडेकारांनी ठाकरे सरकारचे पुन्हा नव्याने नामकरण केले आहे. अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिले, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली. असे नाव न घेता जावडेकरांनी अनेक मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही. गृहमंत्री 6 महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असे कोणते राज्य आहे? असा सवाल करत जावडेकरांनी सरकारला धारेवर धरले.

