मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी कृती आराखडा तयार करा-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

Date:

भिवंडी इमारत दुर्घटनास्थळी दिली भेट
रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

मुंबई दि. २१ – मोडकळीस आलेली इमारत कोसळून असंख्य लोकांनी जीव गमावले आहेत. पण राज्य सरकारला वारंवार सांगूनही शासनाने याची दखल घेतली नाही.मृतांच्या कुटुंबियांना केवळ ५ लाख, १० लाख रुपये देऊन गेलेले जीव परत येणार नाही तर या मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची व सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली.


सोमवारी पहाटे भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला. प्रवीण दरेकर यांनी याठिकाणी भेट देऊन एनडीआरएफ तर्फे सुरु असलेल्या मदत कार्याची पहाणी केली तसेच प्रशासनास सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात जाऊन दुर्घटनेत जखमी लोकांची भेट घेतली व विचारपूस केली. त्यांच्यासोबत आमदार महेश चौगुले, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी सावंत, राजू गाजेंगी, विशाल पाठारे, माजी सरचिटणीस प्रेषित जयवंत,जिल्हा सचिव निलेश कोंडलेकर, आरपीआय अध्यक्ष महेद्र गायकवाड, पूर्व मंडल अध्यक्ष मारुती देशमुख, बालकिशन कल्याडप, भूमेश कल्याडप, लकी भाई आदि उपस्थित होते.

यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य शासनाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवले.. महानगरपालिका वर्षानुवर्षे जुन्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना केवळ नोटीस पाठवून जबाबदारी झटकून देते पण लोकांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था करत नाही. जर लोकांना पर्यायी व्यवस्था दिली तर अश्या घटना घडणार नाही. अश्या प्रकारच्या इमारतींना केवळ नोटिसा पाठवून चालत नाही त्यांची पर्यायी व्यवस्था करण गरजेचं आहे. या इमारतीला नोटीस धाडण्यात आली होत पण राहत्या घरातून बाहेर पडल्यावर पर्यायी व्यवस्था होईल कि नाही या विचाराने मेलो तरी चालेल पण याच घरात राहू. अश्या भीतीच्या सावटाखाली येथील रहिवासी आज जगत आहेत. त्यामुळे नोटीस पाठवूनही घरे खाली झाली नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं..
भिवंडीमध्ये अश्या शेकडो इमारती आहेत ज्यांना तात्काळ डागडुजीची गरज आहे. मागच्या महिन्यात फोर्टमध्ये जेव्हा इमारत पडली होती तेव्हा आम्ही राज्य शासनाला, मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की युद्ध पातळीवर धोकादायक इमारतीचे ऑडिट करून धोकादायक इमारतीमधील लोकांसाठी पर्यायी व्यवस्था करून त्यांच्यासाठी पुनर्विकासाच्या योजना तयार कराव्यात. अश्या दुर्घटनेमध्ये लोकांना नाहक आपले जीव गमवावे लागत आहेत असे सांगून विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, धोकादायक इमारतीचा मुद्दा मुंबई, ठाणे, भिवंडीपुरता मर्यादित नसून तालुका स्तरावर इमारतींच्या डागडुजीची आवश्यकता आहे. या इमारती कुठल्याही क्षणी कोसळतील अश्या अवस्थेत आहे त्यामुळे तात्काळ मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी. या सर्वांचा अनुषंगिक विचार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि या मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत एक कृती आराखडा करावा अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत गृह निर्माण मंत्री, नगरविकास मंत्र्यांनी लक्ष द्यावे. घटनास्थळी येऊन मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख, १० लाखाची मदत घोषित करुन गेलेले जीव परत येणार नाही असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, भिवंडी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करुन अश्या इमारतीबाबत अॅक्शन प्लॅन तयार करुन शासनाला पाठविल्यास आम्ही त्याचा आम्ही पाठपुरावा करू असेही त्यांनी स्पष्ट केले..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर...

लता दीदी या मंगेशकर कुटुंबाच्या आई होत्या

आदिनाथ मंगेशकर ; लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा ;...