पुणे- देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती सर्वात वाइट आहे. मुंबईत एकाच दिवशी बुधवारी 44 रुग्ण सापडले. तर बीडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. पुण्यामध्ये अवघ्या 12 तासांत 3कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीने 1 हजारांची संख्या पार केली आहे.
LIVE अपडेट्स
पुण्यात 12 तासांत 3 मृत्यू
पुण्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. नायडू हॉस्पिटलमध्ये 44 वर्षीय व्यक्तीचा तर ससून हॉस्पिटलमध्ये नायडू 1 आणि नोबेल रुग्णालयात १ मृत्यू झाला आहे. पुण्यात आता मृतांची संख्या 11वर पोहोचली आहे. तर
धारावीत आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण
मुंबईतील धारावी येथे आज आणखी दोन रूग्ण आढळून आले असून यातील एका रूग्णाला आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. धनवाडा चाळ येथे नवीन रूग्ण आढळून आला आहे. यामुळे धारावीतील कोरोना बाधितांचा आकडा आता 9 वर पोहोचला आहे.
अकोल्यात दुसरा पॉझिटिव्ह
कोरोना रुग्ण तपासणी बाबत नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे, हा रुग्ण अकोट फाईल परिसरातील रहिवासी आहे, हा भाग ही सील करण्याची कारवाई प्रशासनाने सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. आता अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या दोन झाली आहे.
बुलडाणात आणखी एक रुग्ण सापडला, एकूण 12 कोरोनाग्रस्त
बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहोचली. बुलडाणात बुधवारी सापडलेला 25 वर्षीय रुग्ण चिखली येथील रहिवासी आहे. तो मरकजवरून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात होता असे सांगितले जात आहे. चिखलीत आता कोरोना बाधितांची संख्या 3 झाली आहे. रात्री उशिरा एकूण 12 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 11 जण निगेटिव्ह निघाले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण
मंगळवारपर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या बीड जिल्ह्यात आता आष्टी तालुक्यातील पिंपळा कोयाळ येथे बुधवारी (दि.8) एक ६३ वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असून त्या रुग्णावर सध्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तत्पूर्वी मंगळवारी एका दिवसात १५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. पैकी ११६ रुग्ण हे फक्त मुंबईतील आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा १०१८ वर गेला आहे. पुण्यात १८, नगर ३, बुलडाणा २, ठाणे २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी, सांगली प्रत्येकी १ अशा नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी राज्यात १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ६ मुंबई, ३ पुणे आणि नागपूर, सातारा, मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली. राज्यात कोरोना बळींचा आकडा ६४ वर पोहोचला आहे. क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात १२ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण झाले आहे.
२०,८७७ पैकी १९,२९० जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७९ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात ३४,६९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४००८ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत.

