पर्यावरण समतोलाची जबाबदारी प्रत्येकाची – जयप्रकाश गोयल

Date:

गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने पर्यावरण दिन साजरा 

पुणे :-  दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठय़ा प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे  अशी भावना गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी व्यक्त केली. बावधन मधील गंगा लिजंड येथे आज पर्यावरण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने प्रत्येकवर्षी  पर्यावरणदिनानिमित्त असंख्य रोपांचे वृक्षारोपण करण्यात येते. यावर्षी देखील बऱ्याच रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयलअमित गोयल, नगरसेवक किरण दगडे पाटील,मुख्य अभियंता कुमार बर्डे,सीईओ किरण कुमार देवी याप्रसंगी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले कि, वनसंपदेवर मनुष्याची बरीच कामे अवलंबून असून वृक्षांचे रोपण व संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.राष्ट्रीय कर्तव्य म्हणून प्रत्येकाने  वृक्षारोपणाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अमित गोयल म्हणाले कि, पृथ्वीचे संरक्षण व पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने यांना पार पाडायची असते. पर्यावरणाचे संरक्षण व त्याप्रती जागरूकता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य पार पाडावे ही आज प्रत्येकाची जबाबदारी बनली पाहिजे. ती आपण निभावली तर उद्याचे आपले भवितव्य उज्ज्वल असेल हे लक्षात  ठेवायला हवे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...