Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खासदार पदामुळे विकासाची जबाबदारी वाढली – गिरीश बापट – राज्यातील मंत्रिपदाचा राजीनामा

Date:

पुणे : राजकारणातील प्रगतीसाठी नव्हे तर केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेत गेलो आहे.

नगरसेवक, आमदार आणि मंत्री म्हणून पुण्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो. यातून काही प्रश्न मार्गी लावले पण आणखी बरंच करायचं आहे. त्यासाठी खासदार म्हणून माझी जबाबदारी वाढली असल्याची मत पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर आज त्यांनी आपल्या आमदार आणि मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला.  

पुणे महानगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक,स्थायी समितीचे अध्यक्ष, कसबा पेठ मतदार संघाचे पाच वेळा अशी यशस्वी कारकीर्द बापट यांची होती. विधानसभा निवडणुकीनंतर  राज्य सरकार मध्ये अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

 यावेळी बोलताना खासदार बापट म्हणाले, पुण्याच्या सर्वांगीण विकासाठी पालकमंत्री म्हणून पीएमआरडीएची स्थापना, पुण्याच्या विकास आराखडयास मंजुरी, पुणे मेट्रो, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोहगाव विमानतळाचा विस्तार,हिंजवडी आयटी पार्क मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांची निर्मिती, जायका प्रकल्प, २४ तास पाणीपुरवठा,  मुंढवा जॅकवेल प्रकल्पाचे  पुनरूज्जीवन असे अनेक विकासाचे प्रकल्प शासन स्तरावर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानाच्या हस्ते पुणे मेट्रोचे पहिल्या टप्याचे उदघाटन झाल्यानंतर हिंजवडी ते शिवाजीनगर अशा दुसऱ्या टप्यालाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. या मार्गाचे काम ही आत्ता सुरु झाले आहे. रिंग रोडची निर्मीतीतून शहरातील  वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून या विभागात अनेक समाजपयोगी निर्णय घेतले. समाजातील सर्वसामान्य घटकांना योग्य दरात अन्न धान्याचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पुरवठा करण्याचे काम या विभागामार्फत होते. गेल्या वर्षी पासून सक्षम सार्वजनिक वितरण प्रणालीचा वापर करून ई पॉस व्दारे धान्य वितरण करण्यात येत  आहे. राज्यातील  १४ जिल्हयात शेतकऱ्यांना कमी दरात रेशन दुकानात अन्न धान्य उपलब्ध करण्यात येत आहे. नवीन गोदाम धोरण, व्दारपोच योजना, अन्न व औषध पध्दती मध्ये सुलभता व कालबध्दता आणली. माझ्या कार्यकाळात अन्न परवाना नोंदणी मध्ये राज्य प्रथम क्रमांकावर राहिले. अन्न व औषध भेसळी करीता कडक प्रावधानाची तरतुद करताना यापूर्वीची  ६ महिन्यांची  शिक्षा बदलून आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतुद केली. अशा विविध योजना मी मंत्री असताना कार्यान्वीत केल्या.

 बापट पुढे म्हणाले, पुण्यातील लोकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास, सहकार्यामुळे पुण्याचा विकासाला चालना देवू शकलो. पुण्यातील विविध विकासाच्या प्रश्नाबाबत लोकसभेमध्ये पाठपुरावा करून केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त विकास निधी मिळविण्याचे उद्दिष्ट माझ्या समोर असल्याचे ही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...

‘आचार संहिता, नैतिक संकेतांची युती सरकार कडून पायमल्ली- काँग्रेस’चा आरोप

‘निवडणूक आयोगा’ने सत्ताधाऱ्यांना कारवाई च्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता...

सातारा जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न: हर्षवर्धन सपकाळ

सातारा ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच महानगरपालिकेच्या निवडणूका घाईगडबडीत...