Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दीड महिन्यात 9604 कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या

Date:

तत्काळ बदलले 2036 नादुरुस्त वितरण रोहित्रे

पुणे, दि. 15 डिसेंबर 2022 :  रब्बीच्या हंगामात विक्रमी उत्पादन होण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ वीज जोडणी व  तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशाची पुणे प्रादेशिक विभागात युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पुणे प्रादेशिक विभागातील पाचही जिल्ह्यात नादुरुस्त शेतपंपाचे रोहित्रे बदलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून गेल्या दीड महिण्यात 9604 कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत तर 2036 नादुरुस्त रोहित्रे बदलण्यात आली आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या असून  महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे नादुरुस्त रोहित्रे बदलण्याच्या कामाचा दैनंदिन आढावा घेत आहेत. 

नुकतेच पुणे येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत श्री ताकसांडे यांनी शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कोटेशनची रक्कम भरून प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या येत्या मार्च 2023 पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही असेही श्री ताकसांडे यांनी स्पष्ट केले आहे 

नोव्हेंबरमध्ये जवळपास 8 हजार कृषिपंप ग्राहकांना वीज जोडण्या  देण्यात आल्या तर चालू डिसेंबर महिन्यात जवळपास 1611 नवीन कृषिपंपाना वीज जोडण्या देण्यात आल्या असून मार्च 2023 पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या ग्राहकांना वीज जोडण्या देण्यासह मागेल त्याला तात्काळ वीज जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक श्री अंकुश नाळे यांनी दिली आहे.

पुणे प्रादेशिक विभागात 29 नोव्हेंबर पर्यंत 1145 नादुरुस्त रोहित्रे नादुरुस्त होती. त्यापैकी 1139 रोहित्रे ही तत्काळ बदलण्यात आली. मात्र शेतात पीक उभे असल्याने 6 जागीचे रोहित्र बदलता आलेले नाही. तर 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत 1153 रोहित्रे नादुरुस्त असून त्यापैकी 897 रोहित्रे ही तत्काळ बदलून मिळालेली आहेत तर उर्वरित 256 रोहित्रे बदलण्याची कारवाई युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

वीज चोरीमुळे जवळपास 2298 रोहित्रे नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे कृषिपंप ग्राहकांनी वीज चोरी करू नये. मागेल त्याला त्वरित वीज जोडणी महावितरणकडून देण्यात येत असून ग्राहकांनी महावितरणकडे त्वरित वीज जोडणीसाठी अर्ज करावा. तसेच कृषिपंप ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरावा असे आवाहन करण्यात येत आहे.

नादुरुस्त रोहित्रे त्वरित बदलून मिळावे यासाठी  मुख्य कार्यालयातर्फे क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑइल उपलब्ध करून देण्यात आले असून रोहित्र दुरुस्त करणाऱ्या एजन्सींनाही तातडीने रोहित्रे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक श्री अंकुश नाळे हे पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर येथील नादुरुस्त रोहित्रांचा व कृषिपंप वीज जोडणीचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...