आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देणारा कनेक्टिंग ट्रस्टचा ‘सपोर्ट सर्व्हायवर’ कार्यक्रम

Date:

पुणे : दिवसेंदिवस वाढत चाललेली बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, सोशल मीडियासह अन्य गोष्टीचे व्यसन, खुंटलेला संवाद, त्यातून आलेले एकाकीपण आणि नैराश्यातून थेट आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी ‘कनेक्ट’ महत्वाचा असतो. गेल्या १६ वर्षांपासून आत्महत्या प्रतिबंधासाठी भावनिक आधार देण्याचे काम पुण्यातील कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था करत आहे.
गेल्या दीड वर्षात कोरोनाने अनेकांच्या जवळची जिवाभावाची माणसे हिरावून नेली. अनेकांचे रोजगार हिरावले; उद्योगधंदे ठप्प झाले. बेरोजगारांच्या संख्येत भर पडली. शाळा-कॉलेज बंद असल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. औषधोपचारांमुळे अनेकजण कर्जबाजारी झाले. लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम यामुळे कौटुंबिक ताणतणाव वाढले असून, त्याचे पर्यावसन टोकाचे नैराश्य, हतबलता आणि अपराधीपणाची भावना येत आहे. यातून बाहेर येण्यासाठी सकारात्मकता पेरण्याचे काम कनेक्टिंग ट्रस्ट करत आहे. विनामूल्य हेल्पलाईनद्वारे आजवर अनेकांशी संवाद करत त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अर्णवाज दमानिया यांनी मानसिक आरोग्यात, विशेष करून आत्महत्या प्रतिबंधाचे काम करण्यासाठी २००५ मध्ये ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.   नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी अशा अनुभवांचा माणसाच्या मनावर आघात होतो आणि त्यातून आत्महत्येचा विचार येतो. अशावेळी त्यांना भावनिक आधार मिळाला, मन मोकळे करता आले तर त्यातून या व्यक्ती स्वतःला सावरू शकतात, या विचाराने अर्णवाज दमानिया यांनी ही संस्था सुरु केली. 
• डिस्ट्रेस हेल्पलाइन प्रोग्राम: ज्यांना कोणत्याही प्रकारचा ताण आहे ते हेल्पलाइन क्रमांक ९९२२००४३०५/९९२२००११२२ यावर फोन करून बोलू शकतात किंवा distressmailsconnecting@gmail.com या ईमेल वर लिहू शकतात. ही हेल्पलाइन आठवड्याचे सातही दिवस दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत चालू असते.• सर्व्हायवर सपोर्ट प्रोग्राम: ज्या व्यक्ती आत्महत्येच्या अनुभवातून गेल्या आहेत. त्यांच्यासाठी ही सेवा असून, त्यांना ८४८४०३३३१२ या नंबरवर एसएमएस करता येतो. त्यांना संस्थेकडून फोन येतो. ही सेवा दर बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी चालू असते.• पियर एज्युकेटर प्रोग्राम: हा कार्यक्रम ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी शाळांमधे चालू असतो.• अवेरनेस (जनजागृती) प्रोग्राम: हा कार्यक्रम समाजातल्या प्रत्येक घटकांना आत्महत्येविषयी जागरूक करतो. 
या सर्व सेवा मोफत आहेत. संस्थेचे स्वयंसेवक लोकांना सहानुभूतीने, निरपेक्षपणे ऐकून घेऊन भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात काळजी, भीती, नैराश्य, आत्महत्येचे प्रयत्न, आत्महत्येतुन मृत्यू यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेले दिसते. या सगळ्याचा परिणाम डिस्ट्रेस हेल्पलाइनच्या कॉल आणि ईमेलच्या संख्येत वाढ झाली आहे. मागच्या एका वर्षात या हेल्पलाइनवर स्वयंसेवकांनी २४२७ कॉलस् आणि ७१७ ईमेलला उत्तर दिले. 
सर्व्हायवर सपोर्ट प्रोग्राम हा फील्ड प्रोग्राम आहे. यामध्ये संस्थेतील स्वयंसेवक हॉस्पिटल आणि वस्ती भेटीतून आत्महत्या अनुभवलेल्या व्यक्तींना भावनिक आधार देतात. परंतु कोरोनामुळे हॉस्पिटल आणि वस्ती भेटी काही प्रमाणात बंद झाल्या. सप्टेंबर २०२० पासून या कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवेकानी फोनद्वारे आत्महत्या अनुभवलेल्या जवळपास २०० व्यक्तींपर्यंत पोचून त्यांना भावनिक आधार दिला. पियर एज्युकेटर प्रोग्राममध्ये ऑनलाइन स्वरूपात तीन शाळांच्या माध्यमातून ९२० विद्यार्थी, १७८ पालक, आणि १२० शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्यातून १६० विद्यार्थी पियर एज्युकेटर म्हणून त्यांच्या मित्रांना भावनिक आधार देण्यास तयार झाले. जनजागृती कार्यक्रमातून २९७६ लोकांपर्यंत आत्महत्या आणि तणावाच्या परिस्थितीत स्वतःची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले. संस्थेतील स्वयंसेवकांचे अथक परिश्रम आणि समर्पणामुळे शक्य झाले.


“एक जीवन वाचवणे खूप समाधान देऊन जाते. बऱ्याच लोकांना आधाराची गरज असते. आपण सर्वानी एकमेकांशी हात मिळवत, आधार देत जीवन वाचवण्याचा प्रयत्न करूया. आत्महत्या अनुभवलेल्या, त्रासात, वैफल्यात असलेल्या लोकांना भावनिक आधार देण्यासाठी किंवा आत्महत्येविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी संवेदनशील, दुसऱ्यांप्रती अनुकंपा आणि धैर्य असलेल्या लोकांची गरज असते. असे लोक एकत्र आले, एकमेकांशी ‘कनेक्ट’ झाले, तर अनेकांना आपण आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो.”


आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्ट व्हा

या चळवळीत आणखी लोकांनी येण्याचे आवाहन अर्णवाज दमानिया यांनी केले आहे. अधिकाधिक लोकांना भावनिक आधार देऊन त्यांना आत्महत्येच्या विचारांपासून दूर नेण्यासाठी आणि आत्महत्या प्रतिबंधासाठी कनेक्टिंग ट्रस्टबरोबर काम करू इच्छिणाऱ्यांनी विक्रमसिंह पवार यांना ७०३०२३००३३ वर संपर्क साधावा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...