गांधींविना काँग्रेस म्हणजे आत्म्याशिवाय शरीर ,गांधींव्यतरिक्त कोणी कॉंग्रेस चालवू शकणार नाही

Date:

पुणे- राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेला जनप्रतिसाद चांगला मिळत असतानाही मिडिया त्याची दखल घेत नाही असा आरोप होत असताना कॉंग्रेसच्या प्रसारमाध्यम संपर्क विभागाचे झालेले पानिपत याकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय , कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत तर ,गांधींविना काँग्रेस म्हणजे आत्म्याशिवाय शरीर ,गांधींव्यतरिक्त कोणी कॉंग्रेस चालवू शकणार नाही असाच प्रत्येक काँग्रेसजनांचा आणि काँगेसला मानणाऱ्या मतदारांचा कौल असूनही तो लक्षात घेतला जात नाही हे दुर्दैव आहे . प्रियांका गांधी किंवा राहुल गांधी या दोहोंनाच अध्यक्षपदासाठी कार्यकर्ते प्रथम प्राधान्य देत आहेत .हि घराणेशाही नाही तर देशाला आणि देश हितासाठी बलिदानाची तयारी ठेवलेल्या कुटुंबाची देशाला असलेली गरज आहे असेही कॉंग्रेसचे निष्ठावंत मानत आहेत . कॉंग्रेस चे अधपतन व्ह्यायला गांधी जबाबदार नसून त्यांच्या नावाने स्वतःचे उखळ पांढरे करून घेणारे कॉंग्रेसचे अन्य नेत्यांनीच कॉंग्रेस संपविण्याचेच कृत्य कायम कलेले असल्याचा दावा केला जातोय .

कल सूरज ने कहा सियाह रात से, ये वक़्त अब तेरे ढलने का है। बादलों की ओट हो या तूफानों का साया, ये वक़्त अब मेरे निकलने का है।।

दरम्यान काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली आहे. बंडखोर जी-२३ गटाचा पाठिंबा असलेले अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रचाराच्या शुभारंभ करताना प्रतिस्पर्धी शशी थरूर यांच्यावर टीका केली.काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वसहमतीने उमेदवार असता तर बरे झाले असते,असे शशी थरूर यांना म्हणालो होतो. परंतु त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. आता माघार घेऊ शकत नाही, अन्यथा पाठिंबा देणाऱ्यांचा विश्वासघात केल्यासारखे होईल. लोकशाहीत दृष्टीने निवडणूक झाली पाहिजे असे थरूर यांचे म्हणणे पडले, असे खरगे म्हणाले. रविवारी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर थरूर यांना फोन केला होता. त्या वेळी सहमतीने उमेदवार निवडण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला, परंतु त्यांनी तो नाकारला. आता एखाद्याने निवडणूक लढवण्याचा निश्चय केला असेल तर त्याला कोण थांबवू शकतो? थरूर मला धाकट्या भावासारखे आहेत. हा आमच्या कुटुंबातील प्रश्न आहे, असे खरगे म्हणाले. खरगे हे गांधी कुटंुबाचेच उमेदवार असल्याचे सांगितले जाते. परंतु खरगेंनी हे नाकारले. गांधी कुटुंबीय आणि ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून त्यांच्या चांगल्या सूचनांवर अंमलबजावणी करू. त्याचबरोबर आता बंडखोरांचा जी-२३ वगैरे गट उरला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अध्यक्षपद उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर असून १७ ऑक्टोबर रोजी मतदान होईल, तर १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तीन पक्ष प्रवक्त्यांचे राजीनामे : अध्यक्षपद निवडणूक नि:पक्षपातीपणे व्हावी यासाठी गौरव वल्लभ, दीपेंद्र हुड्डा आणि सय्यद नासिर हुसेन या तिघांनी काँग्रेस पक्ष प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे. आता आम्ही खरगे यांचा प्रचार करु, असे वल्लभ यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेत सोनियांचा सहभाग : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कर्नाटक येथे ६ अॉक्टोबर रोजी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहेत. तामिळनाडू, केरळनंतर राहुल यांची यात्रा शुक्रवारी कर्नाटकात दाखल झाली. ही यात्रा कर्नाटकात २१ दिवस चालणार असून ५११ किमी प्रवास करणार आहे.

जाहीर वादविवाद झाल्यास लोकांचा रस वाढेल : थरूर खरगेंचा पक्षातील टॉप थ्री नेत्यांमध्ये समावेश आहे, परंतु ते अध्यक्ष बनल्यास पक्षात फार काही बदल घडून येणार नाही. पक्ष कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार केवळ आपणच (थरूर) परिवर्तन करू शकतो तसेच उमेदवारांमध्ये जाहीर वादविवाद झाल्यास लोकांचा रस वाढेल,असे थरूर नागपुरात म्हणाले.

नवी दिल्लीत रविवारी महात्मा गांधींना आदरांजली अर्पण करताना सोनिया गांधी. पाठीमागे मल्लिकार्जुन खरगे. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीनंतरही पक्षाची सूत्रे गांधी कुटुंबाकडेच राहणार हेच दर्शवणारे हे चित्र.

गांधी कुटुंबीयांचा शब्द अंतिम : दिग्विजय सिंह निवडणूक ही निव्वळ धूळफेक असून पक्षाचे नियंत्रण गांधी कुटुंबाकडेच राहील, असा आरोप भाजपने केला आहे. यावर बोलताना भाजपमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक कधी झाली? जे. पी. नड्डा यांची निवड कुणी केली होती, असा सवाल खरगेंनी केला. तर काँग्रेस अध्यक्ष कुणीही होवो, तो गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाखालीच काम करेल, असे ज्येष्ठ नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...