प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत-माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल     

Date:

पुणे- मोदी पुन्हा सत्तेवर आले, तर देशात संविधान आणि लोकशाही टिकणार नाही. या निवडणूकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी अक्षरश: पायघड्या घातल्या होत्या. मात्र त्यांनी अवास्तव मागण्या करुन महाआघाडीत येणे टाळले. राज्यात प्रत्येक मतदार संघात उमेदवार देऊन ते मतांचे विभाजन करुन  अप्रत्यक्ष भाजपला मदत करीत आहेत.
असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच लोक हुशार आहेत, सत्याची बाजू त्यांना कळते त्यामुळे ते महाआघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ गोखले नगर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चव्हाण बोलत होते. यावेळी विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे, आमदार अनंतराव गाडगीळ, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,ज्येष्ठ नेते प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, उमेदवार मोहन जोशी, माजी आमदार दिप्ती चवधरी, भटक्या विमुक्ताच्या प्रतिनिधी प्रा. सुषमा अंधारे, गोपाळ तिवारी, सचिन तावरे, माजी नगरसेवक रुपाली ठोंबरे-पाटील,निलेश निकम, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव आदी उपस्थित होते.       चव्हाण म्हणाले, मोदींनी भरमसाठ आश्वासने दिली. मात्र एकाहीची पुर्तता केली नाही. त्यामुळे पाच वर्षे अत्यंत निराशाजनक गेली. त्यांनी चुकीच्या धोरणामुळे शेतकर्‍यांना उद्धवस्त केले. एक कोटी लोकांचा रोजगार गेला. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. देशभरात अन्याय अत्याचार करणार्‍यांना मोदी पाठिशी घालीत आहेत. मागील निवडणूकीत भाजपला
केवळ 31 टक्के मते मिळाली होती. सुमारे 62 टक्के मतदारांनी त्यांना नाकारले होते. यावेळी महाआघाडीमुळे मतविभाजन टळेल. राफेल विमान खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. चौकशीनंतर मोदींची जागा संसदेत नाही, तर जेलमध्ये असेल. त्यांचे सहकारी अमित शहा जेलमध्ये जावून आले आहेत. ते देशासाठी जेलमध्ये गेले नव्हते, तर
दंगलीत कत्तल केल्यामुळे अटक झाली होती. त्याच वेळी त्यांना अहमदाबाद येथून हद्दपार करण्यात आले होते. असा हल्लाबोल चव्हाणांनी केला.                       न्यायाधीश लोया यांच्यावर राजकीय दबाव होता. त्यांचा मृत्यूही संशयास्पद आहे. सत्तेवर आलो, तर प्रथम लोया, सोहबराद्दीन खुन प्रकरणाची चौकशी करु. देशात खुनाची मालीका सुरुच आहे. पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे. हवाई हल्ल्यात दहशतवादाचे नेटवर्क नष्ट करणे आवश्यक असते. ते केले गेले का असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.
सुषमा अंधारे म्हणाल्या, समाज माध्यमावर उथळ भक्त कलम 124 अ वरुन भरभरून चर्चाकरीत आहेत. मात्र काँग्रेसने हे कलम रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो.
डॉ. नितीन राऊत म्हणाले, संविधानाने महिलांचा स्वाभिमान बहाल केला. हा देश संघराज्य आहे. या राष्ट्राला तडा जाता कामा नये. महिलांवरील अत्याचार वाढले, बेरोजगारी वाढली. आवाज दाबून अभिव्यक्तीवर घाला घातला जात आहे. ज्यांनी आजपर्यंत देशासाठी काहीच केले नाही तेच आता देशवाशीयांना देशभक्ती शिकवित आहेत. त्यामुळे या खोट्या सरकारला या निवडणूकीत पराभव
केला पाहिजे.   डॉ. नितीन राऊत, प्रा. सुषमा अंधारे, रुपाली पाटील-ठोंबरे, निलेश निकम, दत्ता बहिरट, दिप्ती चवधरी यांची भाषणे झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...