‘गिरीष बापट हे दांभिक लोकप्रतिनिधी’ – मोहन जोशी

Date:

पुणे-मुंबईप्रमाणेच पुण्यालाही देशात मोठे महत्व असून पुण्याच्या विकासाचे गिरीश
बापट व भाजप पक्ष ‘स्पीडब्रेकर’ बनले आहेत. आमदार व पुण्याचे पालक मंत्री म्हणून त्यांनी
पुण्याच्या विकासाच्या कोणत्याही योजना आणल्या नाहीत. विकासासाठी केंद्र व राज्याकडून
विकासनिधी आणण्यास ते अपयशी ठरले आहेत. खऱ्या अर्थाने ते दांभिक लोकप्रतिनिधी आहेत
त्यांना पुणेकर या निवडणुकीत निश्चित पराभूत करतील आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यास
पुण्याच्या विकासासाठी संधी देतील असा विश्वास पुणे लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी
काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी आज व्यक्त केला. भवानी माता
मंदिरात भवानी मातेचे दर्शन घेऊन सर्वांना गुढी-पाडव्याच्या शुभेच्छा देऊन भव्य पदयात्रेद्वारे
त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे शेकडो कार्यकर्ते, सर्व पक्षांचे दिमाखात
उंचावलेले झेंडे, ढोल-लेझीमची लय आणि घोषणांच्या निनादात सकाळी साडेनऊ वाजता या भव्य
पदयात्रेस
प्रारंभ झाला. संपूर्ण मार्गावर दुतर्फा नागरीकांनी व महिलांनी कुंकुमतिलक लावून व ओवाळून
मोहन जोशी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मार्गावर ठिकठिकाणी अनेक व्यापारांनी जंगी स्वागत
केले तस्सेच मार्गावर विविध ठिकाणी गुलाब-पुष्पांच्या पाकळ्या उधळण्यात आल्या. ठिकठिकाणी
पाणी व उसाचा रस घेण्याचा आग्रह होत होता. मार्गावरील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील जोशी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
दुपारी दोनपर्यँत चाललेल्या या पदयात्रेत माजी मंत्री नितीन राऊत व उमेदवार मोहन जोशी
यांच्यासह शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे, खा.
वंदना चव्हाण, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, प्रांतीकच्या सहप्रभारी सोनल पटेल, प्रवीण गायकवाड,
अंकुश काकडे, काँग्रेसचे मनपा गटनेते अरविंद शिंदे , अविनाश बागवे, माजी आमदार कमल
ढोले पाटील, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड , रोहित टिळक, मनीष आनंद, नीता परदेशी, संगीता

तिवारी, सुजाता शेट्टी, चांदबी नदाफ, लताताई राजगुरू , वीरेंद्र किराड , जयंत किराड, रवींद्र
धंगेकर, रफिक शेख, सुनील मलके, रशीद शेख, भारत कांबळे, शानी नौशाद, विठ्ठल थोरात,
सुजित यादव, सुनील घाडगे, सुरेश व्यास व इतर शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. पदयात्रेत
महिलांची संख्या लक्षणीय होती.

पदयात्रेनंतर झालेल्या समारोपाच्या सभेत माजी मंत्री नितिन राऊत म्हणाले की,
केंद्रातील मोदी सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली घटना बदलण्याचा
प्रयत्न करीत असून देशातील गरीब मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले होत
आहेत, अन्याय होत आहेत. देशातील लोकशाही व राज्यघटना शाबूत ठेवण्यासाठीं हुकूमशाही
वृत्तीच्या नरेंद्र मोदी व भाजप सरकारला आता बदललेच पाहिजे. आज गुढी पाडव्याचा दिवशी
मोहन जोशी यांचा प्रचाराचा शुभारंभ होत आहे आता विजयाची गुढी देखील आपण उभारू असे
नितीन राऊत यांनी म्हटले.
याप्रसंगी उल्हासदादा पवार म्हणाले कि, केंद्रातील मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था
खिळखिळीत केली आहे. कोट्यवधी तरुण बेकार असून शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला
आहे. त्यामुळे देशात आता परिवर्तनाची गरज आहे असे ते म्हणाले.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले कि, मोदी सरकारच्या काळात महागाई मोठ्या
प्रमाणात वाढली असून गरीब, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय जनता महागाईच्या आगीत होरपळून
निघत आहे. त्यामुळेच जनता आता निर्धार करून केंद्रातील मोदी सरकार निश्चित बदलेल असा
विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दलित आणि मुस्लिम समाजावर मोठे अत्याचार होत असून
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सरकार केंद्रात आणावयाचे आहे असे ते
म्हणाले.
याप्रसंगी प्रवीण गायकवाड म्हणाले, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची मोठी परंपरा
महाराष्ट्राला आहे. केंद्रातील जातीय धर्मांध सरकार राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करीत असून
आपल्याला लोकशाहीमुळे मिळालेल्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावरही घाला घालीत आहे. हि विचारांची
लढाई असून समानता आणि विषमता हे दोन विचार आहेत. याच पुण्यात विषमतेच्या
विचाराविरुद्ध महात्मा फुले यांनी संघर्ष सुरु केला. नरेंद्र मोदी यांचे जातीय-धर्मांध सरकार आता

बदललेच पाहिजे. राहुल गांधी यांनी गरिबांच्या उत्पन्न वाढीसाठी जाहीर केलेल्या योजनेमुळे
गरिबांना मोठा आधार मिळेल असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रशीद शेख म्हणाले, महागाई
गगनाला भिडली असूनअच्छे दिन आले आहेत काय? असा मतदानाला जाताना मतदारांनी
विचार करायलाच हवा. भारत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

भवानी माता मंदिरापासून निघालेली ही पदयात्रा -जुना मोटार स्टॅन्ड चौक – सरस्वती
सोसायटी – पदमजी चौकी- कादरी मंजिल- जीज्ञासा वसाहत- मिलिंद मंडळ-जय भीम मंडळ- एसं
आर.ए. वसाहत पत्राची चाळ – प्रगतीशील मंडळाच्या गल्लीत- कॉलनी नंबर १२- ए.डी . कॅम्प
चौक- किराड हॉस्पिटल- संत कबीर चौक- भोर्डे आळी -बुढण आळी – इस्लामपूर- रास्ते मांग
वाडा – राजेवाडी – भवानी पेठ पोलीस लाईन – पदमजी चौकाकडून निशात टॉकीज – गाडी अड्डा
– मंजुळा बाई चाळ – वोचमकर शाळा – गणपती भुई चाळीतून चुडामण तालीम चौक- नवी हिंद
समोरून चुडामण तालीम वसाहत – बाहेर निघून सातशे सातारा भवानी पेठ कब्रस्तान – हरका
नगर वसाहत – ५१२ भवानी पेठ- भीम जादे अपार्टमेंट – बर्फाचा कारखाना – तबेला – नंदेश
कॉइनर – राजीव गांधी पतसंस्था – कामगार मित्र मंडळ – काशेवाडी- श्री कृष्ण मंदिर परिसर –
अमरज्योत मित्र मंडळ पोलीस चौकी – सिद्धार्थ नगर- पोलीस चौकी – दीपज्योती मंडळ –
लमाण गल्ली- बंधुभाव मित्र मंडळ- सीताई मित्र मंडळ- सरळ मार्गे पोलीस चौकी – किशोर
जरबंडी घरामागून आकाश ज्योत मंडळ – महात्मा फुले मंडळ – शाहिद अब्दुल रहमान अंजुमन
मस्जिद – शिंदे कागदवाले – विशाल क्रांती मंडळ – चमन शहा दर्गा पासून नवनाथ मंडळ ते १०
नंबर कॉलनी – गेट नं १ मधून राजीव गांधी वसाहत – कॉलनी परिसर – गेट नं २ – म्हसोबा
मंदिर – सेवक मंडळ – सुरेश भंडारी घर मागील परिसर – हनुमान मंडळ – डोईफोडे मामा घरा
पासून – सुरेख खंडाळे यांच्या घर पासून चमन शाळा चौक- शाहिद अब्दुल रहमान चौक-
एस.आर.ए. बिल्डिंग – या मार्गाने जाऊन पिंपळ मळा येथे दुपारी समारोप करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...