पुणे-वाढत्या पेट्रोल – डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आज संत कबीर चौक नाना पेठ ते अल्पना टॉकीज पर्यंत दुचाकी ढकल मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारच्या विरूध्द निषेधाचे फलक घेवून कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘‘बेचारी जनता करे पुकार, लुट रही है मोदी सरकार’’, ‘‘पेट्रोल डिझेल की मंहगाई, यही है क्या अच्छे दिन की पेहचान?’’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यानंतर दुचाकी वाहने ढकलत पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अल्पना टॉकिज पर्यंत गेले.
त्याठिकाणी आपल्या भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने
वाढविलेले पेट्रोल व डिझेलचे दर हे आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वात जास्त दर आहे.पेट्रोल व डिझेलच्या वाढलेल्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या असून त्यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष असून जनतेची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे.इंधन दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून सर्व सामान्यांना याचामोठा आर्थिक फटका बसत आहे. आज राज्यात पेट्रोलचा दर प्रती लिटर ८४.५० रूपयांच्या वर गेला आहे तर डिझेल प्रती लिटर ७० रूपयांच्या वर पोहोचले आहेत. राज्यात इंधनावर अनेक कर लावले जात आहेत. काँग्रेस प्रणित यु.पी.ए. सरकार असताना अंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल वाढलेले असताना सुध्दा यु.पी.ए. सरकारने पेट्रोल – डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले होते. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रती लिटर ६० ते ६५ रूपये पर्यंत असायचे. आता या नविन दरवाढीमुळे
जीवनावश्यक वस्तूंवर सुध्दा परिणाम होणार आहे. सामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे.’’
यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की,
‘‘मोदी सरकारला पेट्रोल – डिझेलच्या दरावर नियंत्रण ठेवता आले नाही. काँग्रेस -प्रणित यु.पी.ए. सरकार असताना आतंरराष्ट्रीय कच्चा तेलाचे भाव वाढत
असताना सुध्दा जनतेचे हित लक्षात घेऊन पेट्रोल – डिझेलचे दर नियंत्रणात ठेवले
होते. मोदी सरकारच्या काळात पेट्रोल – डिझेलचे दर वाढण्याची अनेक कारणे आहेत.
मोदी सरकारचे चूकीचे आर्थिक धोरणामुळे उत्पन्न कमी आहे, बँकांमध्ये कर्जाचा बोजा वाढलेला आहे. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. केंद्र सरसकार व राज्य सरकार पेट्रोल – डिझेलवर लावलेले विविध कर कमी करण्यास तयार नाही आणि सरकार जनतेवर हा भुर्दंड लादत आहे.’’
यानंतर माजी आमदार बाळासाहेब शिवरकर व मोहन जोशी यांचीही भाषणे
झाली.
यानंतर काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने पुणे उपजिल्हाधिकारी मा. विजयसिंह देशमुख
यांना भेटून पेट्राल – डिझेल दरवाढ कमी करणेबाबत निवेदन सादर केले.
यावेळी कमल व्यवहारे, अरविंद शिंदे, लता राजगुरू, सुजित यादव, सुजाता
शेट्टी, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, अविनाश बागवे, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट,
मनीष आनंद, रमेश अय्यर, विकास टिंगरे, शेखर कपोते, मीरा शिंदे, अनुसया
गायकवाड, संगिता तिवारी, युवक अध्यक्ष विकास लांडगे, बाळासाहेब अमराळे,
नुरूद्दीन सोमजी, अमित बागुल, ब्लॉक प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, जयकुमार
ठोंबरे, भारती कोंडे, नागेश भालेराव, चेतन आगरवाल, सुमीत डांगी, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, चैतन्य पुरंदरे, बाळासाहेब आमराळे, अभिजीत महामुनी, राजेंद्र गायकवाड, ॲन्थोनी जेकब, विक्रम खन्ना आदी उपस्थित होते.