पुणे – नोटाबंदीचा निर्णय होऊन ५० दिवसाचा कालावधी उलटूनसुद्धा सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाही. या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यात आला यावेळी कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नोटाबंदीचा होणारा त्रास कमी होत नसून, तो वाढत आहे. सर्व सामान्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. याला केंद्र आणि राज्य शासनाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे. मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय फसला आहे. त्यांनी लोकांची फसवणूक केली आहे. शिवाय उद्योगपतींचे काळ्याचे पांढरे पैसे केले, तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसाला मात्र कायद्याच्या कचाट्यात ठेवले.
त्यामुळे या राज्यासह देशातील नागरिक या निर्णयाने त्रस्त झाला. याविरोधात हा घेराव घालण्यात आला यावेळी महिलांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शरद रणपिसे,दीप्ती चौधरी, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे ,कमल व्यवहारे,अजित दरेकर,आणि कार्यकर्ते उपस्थित होते.