सूडाचे राजकारण सोडा, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढा -मनमोहन सिंग

Date:

नवी दिल्ली – अर्थतज्ज्ञ, माजी पंतप्रधान आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आर्थिक संकटावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले. मोदी सरकारने सूडाचे राजकारण सोडून देशाला आर्थिक संकटातून बाहेर कसे काढता येईल यावर लक्ष द्यावे असे आवाहन सिंग यांनी रविवारी केले आहे. भारतात ओढावलेले आर्थिक संकट, 5 टक्क्यांवर आलेला जीडीपी या सर्वच गोष्टींसाठी मोदी सरकारचे वाइट व्यवस्थापन जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.

मनमोहन सिंग म्हणाले, गेल्या त्रैमासिकात आपला विकास दर 5% झाला. यावरून अर्थव्यवस्था मंदावल्याचे स्पष्ट होत आहे. भारतात झपाट्याने विकास करण्याची क्षमता आहे. आपला देश सातत्याने अर्थव्यवस्थेच्या स्लोडाउनचा धोका पत्करू शकत नाही. यासाठी मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी सूडाचे राजकारण सोडावे आणि देशाला या संकटातून बाहेर कसे काढता येईल या दिशेने पावले उचलावी. भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहून मोदी सरकारचे व्यवस्थापन प्रत्येक स्तरावर कुचकामी ठरल्याचे दिसून येते. यासाठी नोटाबंदी आणि जीएसटी अशा स्वरुपाचे निर्णय देखील जबाबदार आहेत. या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जे नुकसान झाले, त्यातून देश अजुनही सावरलेला नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काैसरबागेत कार पार्किंगवरून हाणामारी:तलवारीने वार

पुणे -काेंढवा परिसरातील काैसरबाग याठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंगवरुन...

ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुलुंडमध्ये रंगणार `पुकारता चला हूं मैं’!

सांस्कृतिक कार्यमंत्री एँड आशिष शेलार यांची संकल्पना कालिदास नाट्यमंदिरात रसिकांना...

पालघर ते सिंधुदुर्ग पट्टा लाडके उद्योगपती अदानी, अंबानीला आंदण देण्याचा भाजपा सरकार घाट: हर्षवर्धन सपकाळ.

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, महिला अत्याचार, शेतकरी...