मुख्यमंत्री म्हणतात – राज्यात सीएए लागू झाला तरी कुणाला त्रास होणार नाही; शरद पवारांचा विरोध

Date:

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) संदर्भातील गोंधळाच्या स्थितीविषयी विधान केले आहे. ते म्हणाले की, एनआरसी राज्यात लागू होऊ देणार नाही. सीएएमुळे राज्यात कोणाला त्रास होणार नाही आणि एनपीआर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचा एक भाग आहे. मात्र या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एनपीआर आणि सीएए लागू करण्याच्या निर्णयाबद्दल काही स्पष्ट सांगितले नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंच्य या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीएए, एनपीआर आणि एनआरसी बाबत मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे मत आहे. मात्र आमचा याला विरोध आहे असे पवार म्हणाले.

‘सीएए, एनआरसी आणि एनपीआर तिन्ही वेगवेगळे

उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सीएए, एनआरसी आणि एनपीआर तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यामुळे कोणाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही राज्यात एनआरसी लागू करणार नाहीत. सीएएमुळे राज्यातील कोणत्याच नागरिकाला घाबरण्याचे कारण नाही. तर एनपीआर दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचा एक भाग आहे.

तर या मुद्द्यावर शरद पवार यांनी पुन्हा एकदा सांगितले की, एनपीआर, सीएए आणि एनआरसी मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचे स्वतःचे मत असू शकते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने संसदेत याविरोधात मतदान केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...