पुणे-महापालिकेत स्थायी समिती मार्फत दरवर्षी होण अखेरीस होणारी वर्गीकरणे हि संशयाच्या भोवऱ्यात असतातच पण यंदा महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर या वर्गीकरणाचे कट आखले जात असल्याचे आरोप होत असून माहिती असूनही महापालिका आयुक्त देखील यास साथ देत असल्याचा संशय व्यक्त होतो आहे . वर्गीकरणासाठी प्रशासन आणि राजकीय पक्ष ‘हम साथ साथ ही ची भूमिका राबवीत आल्याचे दिसते आहे तर आपापल्या प्रभागात ‘साध्या साध्या ‘ कामासाठी वर्गीकरणाचे आग्रह नेत्यांना पत्करावे लागत आहेत . स्थायी समितीच्या बैठकातून हे वर्गीकरणाचे प्रस्ताव मुख्य सभेकडे पाठविण्यात येतात आणि आता अॉनलाइन मुख्य सभांतून ते चर्चेविना सहज संमत होणार आहेत .
कालच्या स्थायी समिती बैठकीत कर्वे रस्त्यावरील उड्डाणपुलाचे ९ कोटी रुपये जी तरतूद करण्यात आली होती त्यातील ३ कोटी रुपये वळविण्यात आलेत .महापौर मोहोळ यांच्या प्रभागात करिष्मा चौक ते कर्वे पुतळा असा हा उड्डाण पुल प्रस्तावित असताना आता हि रक्कम खर्ची पडणार नसल्याचे कारण देऊन प्रभागातील स्वच्छतागृहे दुरुस्त करणे ,विद्युत विषयक कामे करणे, थर्मो प्लास्टिक चे पत्ते मारणे अशा १८ प्रकारच्या कामांचा उल्लेख करत हा निधी वळविला आहे. तर आमदार मुक्ता तिलक यांच्या प्रभागात सरस बाग ते अप्पा बळवंत चौक असा उड्डाणपूल बांधण्यासाठी १ कोटी ची तरतूद होती तीही खर्ची पडणार नसल्याने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी वळविण्यात आली आहे.
हि वर्गीकरणे मोठी गंमतीदार आहेत . महापौरांच्या वॉर्डात उड्डाण पुलाला तरतूद केलेले ९ कोटी रुपये खर्ची पडणार नसल्याचे चक्क जानेवारीच्या मध्यावर लक्षात येणे आणि ती रक्कम १८ प्रकारच्या साध्या साध्या कामांवर वळविणे हा विषय चर्चेच्या घेर्यात सापडू शकणारा आहे . मार्च पूर्वी आता हि रक्कम खर्च होणार आहे म्हणजे १८ प्रकारची कामे पूर्ण करून ३ कोटी खर्च करून टाकले जाणार आहेत . यात प्रश्न असा निर्माण होतो कि, २ वर्षे बजेट केलेल्या माननीयांनी या १८ प्रकारच्या साध्या साध्या कामांसाठी यंदा बजेट करताना तरतूद केलेली नव्हती काय ?आमदार सध्या आमदार असलेल्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवकांच्या वार्डातील सारसबाग ते अप्पा बळवंत चौक उड्डाणपुलासाठी केलेली १ कोटीची तरतूद वर्षभरात का खर्च होऊ शकली नाही ? आणि खड्डे बुजविण्यासाठी त्यांनी यंदाच्या बजेट मध्ये तरतूद करवून घेतली नव्हती काय ?
या सर्व पार्श्वभूमीवर वर्गीकरणातून नेमकी कोणकोणती कामे होत आहेत यावर लक्ष कोण ठेवणार ? खरेच हि कामे होतात काय ? कि केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून त्यांची बिले काढली जातात ? या प्रश्नांचा भडीमार आता होऊ शकतो . पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचीच हातमिळवणी झाल्याने व्न्नन्न्वार्गीकार्नाचे विषय संशायाच्याच भोवर्यात अडकत आले आहेत . त्यात आता यंदा निवडणुकांना सामोरे जायचे आहे.

