मुख्यमंत्र्याचा फेसबुक संवाद म्हणजे बोलबच्चनगीरी … कृती मात्र नाही-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

Date:

मुंबई दि. ११ ऑक्टोबर – मुख्यंमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केलेल्या संवादातून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांचा आजचा हा संवाद म्हणजे केवळ बोलबच्चनगीरी आहे, ते फक्त वक्तव्ये करतात, कृती मात्र कुठे दिसत नाही, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधल्यानंतर प्रविण दरेकर म्हणाले की, मंदिर उघडण्याची मागणी होत असताना, एका बाजूला मदिरालये उघडली जात आहेत. पण सरकार मंदिरे उघणार नाहीत असे मुख्यमंत्री सांगत आहे, त्यामुळे यावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे बदलले वैचारिक स्वरुप राज्यातील जनतेसमोर आले आहे.
लोकल सुरु करण्याची मागणी होत असताना, मला गर्दी नको, त्यामुळे लोकल ट्रेन सुरु करणार नाही असे मुख्यमंत्री सांगत आहे पण तुम्हाला काय हवे हे महत्त्वाचे नाही तर जनतेला काय हवे आहे याचा कधीतरी विचार करा. आपला संवाद हा नकरात्मक सांगण्यासाठीच असतो का ? काही तरी सकारात्मक गोष्टीची अपेक्षा आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
लोकल ट्रेन सुरु होणे महत्त्वाचे आहे. कारण आज उपासमारीने नागरिक हैराण आहेत. उद्योगधंदे बंद पडलेत. कोरोनाने मरण्यापेक्षा उपासमारीने मरणार की काय अशी परिस्थीती आहे, त्यामुळे जीवनचक्र सुरु करण्यासाठी लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही, यावरुन जनतेच्याबाबतची त्यांची संवदेना दिसून येते अशी टिकाही दरेकर यांनी केली.
शेतक-याला वा-यावर सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात, परंतु आपण नुकताच मराठवाड्याचा दौरा केला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने पूर्णपणे मराठवाडातील शेतक-यांची शेती उध्दवस्त झाली आहे. अजूनही शेतक-याला कवडीची मदत नाही, पंचनामे झाले नाहीत. तो शेतकरी मदतीची वाट पाहत आहे, सरकारने त्याला वा-यावर सोडले आहे, अश्या स्थितीत केवळे शेतक-याला वा-यावर सोडले आहे असे बोलून चालत नाही. त्यामुळे केवळ बोलाची कढी व बोलाचाच भात यांच्या वक्तव्यावरुन दिसून येतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उक्तीपेक्षा कृती करा असे आवाहनही दरेकर यांनी केले.
मेट्रो कारशेड आरेतून हलवली, आता कांजूरमार्गला हलविली. पण सारखे असे होत असताना प्रकल्पावर जो खर्च झाला आहे, त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल दरेकर यांनी केला. तसेच भांबावलेल्या अवस्थेत प्रकल्पाविषयी भूमिका घेऊ नका तर वस्तुस्थितीवर घ्या असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री यांचा संवाद जनतेला अपेक्षाहिन वाटतो. काहीतरी दिलासा मिळेल या आशेने मुख्यमंत्र्याकडे जनता पाहत आहे. पण संवाद एकल्यावर जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास होतो आहे.
मुख्यमंत्री म्हणतात की, कोविड काळात जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आमची आहे, ती आम्हाला कळते. जर जबाबदारी तुमची आहे मग माझे कुटुंब माझी जबाबदारी असे सांगून ती जबाबदारी तुम्ही कुटुंबावर का सोडता, कारण सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे कधी बाजूने तर कधी विरोधात अशी संभ्रमावस्थेतील वक्तव्ये मुख्यमंत्र्यांची पाहायला मिळतात, त्यामुळे या संकटमय परिस्थितीत जनतेला काहीही दिलासा मिळत नाही अशी टिकाही दरेकर यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...

राष्ट्रीय समाज पक्ष व काँग्रेस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूका एकत्र लढणार

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...