मुख्यमंत्री काँग्रेस महापालिकांना निधी देत नाहीत, अशोक चव्हाणांनी लावला गंभीर आरोप

Date:

महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत असते. तिन्ही पक्षांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याच्या चर्चा नेहमीच केल्या जात असतात. आज पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधीत देत नसल्याचा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

अशोक चव्हाण याविषयी बोलताना म्हणाले की, ‘काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही. याच कारणामुळे नांदेडलाही निधी मिळालेला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला’ असे वक्तव्य अशोक चव्हाणांनी केले आहे. अशोक चव्हाण हे परभणीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा चव्हाणांनी घेतला.

अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, आपण सत्तेत असतो तेव्हा आपल्या भागाचा विकास व्हायला हवा या मताचा मी आहे. मात्र दुर्देवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला. मात्र मराठवाड्यात जास्तीत जास्त निधी देण्याची माझी भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. यासोबतच चव्हाणांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याविषयीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. मात्र राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...

भाजपचे नेते गुंडाना पोसण्याचे काम करत आहेत-मिलिंद एकबोटे

तर भाजपाचीही काँग्रेससारखी दयनीय अवस्था होईल हिंदुत्वाची उपेक्षा कराल, तर हिंदुत्ववादी...