बार्टीच्या निधीबाबत केंद्र सरकारने लक्ष घालावे – सुनील माने यांची रामदास आठवले यांच्याकडे मागणी

Date:

पुणे : बार्टीला निधी देण्याबाबत राज्य सरकारकडून अन्याय होत आहे. याबाबत केंद्र सरकारने लक्ष घालून महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले निवेदनाद्वारे केली.रामदास आठवले शनिवारी पुणे दौऱ्यावर होते यावेळी त्यांची भेट घेऊन सुनील माने यांनी त्यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मागासवर्गीय समाज तसेच विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या बार्टी संस्थेने महाराष्ट्र सरकारकडे यंदाच्या अर्थसंकल्पांत ३०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र एप्रिलपासून महाराष्ट्र सरकारने बार्टीला निधी उपलब्ध करून दिला नाही. बार्टी सातत्याने मागासवर्गीय समाजाच्या तसेच विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी उपक्रम राबवत असते. राज्य सरकारच्या अशा धोरणामुळे संस्था अडचणीत येऊ शकते. हा निधी त्वरित बार्टीला मिळण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा.

त्याचप्रमाणे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात ‘थॉटस ऑन इंडिया नँशनल सेक्युरिटी’ हा कोर्स सुरु होता. मात्र सध्या हा कोर्स बंद असून राज्य सरकारने त्यासाठी निधी देणे थांबवले आहे. या बरोबरच बाबासाहेबांच्या १२५ व्या  जयंती वर्षाचे औचित्य साधुन पाली ञिपिटिकाचे मराठी भाषांतर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील पाली विभागासोबत करार करण्यात आला होता, मात्र महाराष्ट्र सरकारकडून विद्यापीठासोबतचा हा करार रद्द करण्यात आला आहे. या सर्व बाबतीत आपण लक्ष घालून महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय मंत्र्यांबरोबर बैठक लावावी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...