शेतकरी आंदोलनाच्या विजयाबद्दल पुण्याच्या कॉंग्रेस भवनात आनंदोत्सव

Date:

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शेतकऱ्यांचे ३ काळे कृषी कायदे रद्द केल्याबद्दल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

     गेल्या वर्षी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात ३ कृषी कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर हुकूमशाही पध्दतीने मंजूर करून घेतले.‌ काँग्रेस पक्षाने सुरूवातीपासूनच या ३ काळ्या कृषी कायद्याला विरोध केला होता. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चर्चे दरम्यान काँग्रेसने विरोधाची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेवून लढा दिला. पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देवून या आंदोलनाला यशस्वी केले. विरोधकांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना ३ काळे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली होती परंतु पंतप्रधानांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आज सकाळी पंतप्रधान देशाला संबोधित करताना म्हणाले की, ‘‘केंद्र सरकारने जो कृषी कायदा अमंलात आणला होता तो कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द करीत आहे.’’ पंतप्रधानांना उशिरा का होईना शहाणपण सुचले. पंजाब व उत्तर प्रदेशातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला. पंजाब व उत्तर प्रदेशचे शेतकरी कृषी कायद्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होते हे पंतप्रधानांना माहित होते. आज गुरूनानक यांची जयंती असल्यामुळे पंतप्रधानांनी हा निर्णय घेवून पुन्हा या लोकांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पंतप्रधानांनी आंदोलनजीवी म्हणून संबोधित केले होते. आज त्याच आंदोलनजीवींकडे माफी मागवी लागली ही शोकांतिका आहे. कडाक्याची थंडी, ऊन, पाऊस मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. अनेक शेतकऱ्यांच्या कुटूबांना त्रास झाला. या आंदोलनामध्ये जवळपास ६०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला याला जबाबदार कोण? याचे उत्तर पंतप्रधांनी द्यावे. भारतीय जनता पक्षाची दुटप्पी भूमिकेचा आज पर्दाफाश झाला आहे.

      येत्या निवडणुकीमध्ये देशाची जनता भारतीय जनता पक्षाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या एकीमुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकारला हा कायदा रद्द करावा लागला. मी शेतकऱ्यांचे आणि काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे अभिनंदन करतो.

     यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागुल, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, वाल्मिक जगताप, राजेंद्र पडवळ, सुनिल दैठणकर, प्रशांत सुरसे, यासीन शेख, शिलार रतनगिरी, सुरेश कांबळे, सौरभ अमराळे, परवेज तांबोळी, विनय ढेरे, हेरॉल्ड मॅसी, राजू नाणेकर, मीरा शिंदे, रणजित गायकवाड, राहुल तायडे, नितीन परतानी, चेतन आगवाल, फैय्याज शेख, दत्ता जाधव, रोहित धेंडे, रजनी त्रिभुवन, दुर्गा शुक्रे, प्राची दुधाने, संगिता क्षिरसागर, विश्वास दिघे, ज्योती परदेशी, विठ्ठल गायकवाड, अक्षय माने, हनुमंत पवार, विक्रम खन्ना, आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.