News

अमेरिकेने मादुरोंची त्वरित सुटका करावी चीनची मागणी ,राष्ट्रपतींचे अपहरण करणे चुकीचे;व्हेनेझुएलावर हल्ल्याने न्यूयॉर्क मेयर ममदानीही नाराज

कराकस-सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची व्हेनेझुएलातून तत्काळ सुटका करण्याची मागणी चीनने केली आहे. अमेरिकन सैन्याने त्यांना व्हेनेझुएलाची...

 सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली- गिरीश कुबेर

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) आपण समाज म्हणून गुणवत्तेला मान द्यायला शिकलो नाही. सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली आहे. आपण बुद्धिवंतांचा आदर करत नाही. सत्ता हेच आपल्याला सौंदर्य वाटू लागले आहे. हे महाराष्ट्रासाठी जास्त धोकादायक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ४) आयोजित विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. किशोर बेडकीहाळ आणि प्रसन्न जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कुबेर म्हणाले, आज प्रसार माध्यमांना उत्तरदायित्व उरलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. काही वृत्तपत्रांचे मालक हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते विशिष्ट बाजू घेऊन पत्रकारिता करतात. परंतु त्यामुळे समग्र माध्यमांवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला जातो. त्यातून पत्रकारिता सरसकट बदनाम होत राहते. वास्तुत: शरणता न दाखवणे हे माध्यमांचे हे प्रमुख कर्तव्य आहे. माध्यमांनी आपले काम चोखपणाने करणे अपेक्षित आहे.मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही. आजच्या साहित्य विश्वावर भाष्य करताना ते म्हणाले, आजही मोठा वाचकवर्ग पुलंच्या पुढे गेलेला नाही. माध्यमांनी निवडक वर्गाला प्राधान्य दिले आहे. भूमिका न घेणे हे सडू लागलेल्या समाजाचे लक्षण आहे.

अदाणीना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ ८ नामांकित लेखकांनी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’चे मार्गदर्शक पद सोडले

पुणे:आता साहित्य क्षेत्रातही 'गौतम अदाणी' यांच्या नावावरून वादाचे वादळ उठले आहे. बारामती येथील 'शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय' (Sharad Pawar Center for...

रहस्यकथा, भयकथांना स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जा मिळावा

साहित्य संमेलन परिचर्चेत सहभागी लेखक-आस्वादक-विचारवंतांची भूमिका स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांना जितके महत्त्व साहित्यव्यवहारात मिळायला हवे तितके मिळालेले नाही. त्यामागे आकलनाचा दुष्काळ...

मराठी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे

सातारा -साताऱ्यात आयोजित अखिल भारतीय मराठी संमेलनात आज एक खळबळजनक घटना घडली. या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला आज एका व्यक्तीने काळे फासले....

Popular