News

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन

पुणे-पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास...

पोलिसांच्या समक्ष दिल्लीत भररस्त्यात पँट काढून तरुणाला मारहाण:घरातून ओढत नेले, वडिलांनाही मारहाण;बघे बनले पोलीस

नवी दिल्ली- दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरात वडील आणि मुलाला भररस्त्यात मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 2 जानेवारीची असून, त्याचे सीसीटीव्ही...

ट्रम्प यांची व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्रपतींना धमकी:म्हणाले- अमेरिकेचे ऐकले नाही तर मादुरोपेक्षाही वाईट अवस्था करेल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांना वाईट अवस्था करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले, 'जर डेल्सीने व्हेनेझुएलासाठी अमेरिका जे...

अमेरिकेने मादुरोंची त्वरित सुटका करावी चीनची मागणी ,राष्ट्रपतींचे अपहरण करणे चुकीचे;व्हेनेझुएलावर हल्ल्याने न्यूयॉर्क मेयर ममदानीही नाराज

कराकस-सध्या अमेरिकेच्या ताब्यात असलेले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीची व्हेनेझुएलातून तत्काळ सुटका करण्याची मागणी चीनने केली आहे. अमेरिकन सैन्याने त्यांना व्हेनेझुएलाची...

 सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली- गिरीश कुबेर

स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) आपण समाज म्हणून गुणवत्तेला मान द्यायला शिकलो नाही. सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली आहे. आपण बुद्धिवंतांचा आदर करत नाही. सत्ता हेच आपल्याला सौंदर्य वाटू लागले आहे. हे महाराष्ट्रासाठी जास्त धोकादायक आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ४) आयोजित विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. किशोर बेडकीहाळ आणि प्रसन्न जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कुबेर म्हणाले, आज प्रसार माध्यमांना उत्तरदायित्व उरलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. काही वृत्तपत्रांचे मालक हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते विशिष्ट बाजू घेऊन पत्रकारिता करतात. परंतु त्यामुळे समग्र माध्यमांवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला जातो. त्यातून पत्रकारिता सरसकट बदनाम होत राहते. वास्तुत: शरणता न दाखवणे हे माध्यमांचे हे प्रमुख कर्तव्य आहे. माध्यमांनी आपले काम चोखपणाने करणे अपेक्षित आहे.मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही. आजच्या साहित्य विश्वावर भाष्य करताना ते म्हणाले, आजही मोठा वाचकवर्ग पुलंच्या पुढे गेलेला नाही. माध्यमांनी निवडक वर्गाला प्राधान्य दिले आहे. भूमिका न घेणे हे सडू लागलेल्या समाजाचे लक्षण आहे.

Popular