मुंबई दि.१० मे :- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जुन २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ...
नवी दिल्ली. एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. नुकतंच हे सर्वजण कार्गो फ्लाइटने चीनला गेले होते. उड्डाण घेण्याच्या 72 तासांपूर्वी...
मुंबई. मटका किंग रतन खत्री यांचे निधन झाले आहे. मुंबईतील नवजीन सोसायटीतील राहत्या घरा त्यांनी 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते...
मुंबई, दि.१० मे २०२० :
मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले कृषिपंपांसाठीचे नवीन वीजजोडणी धोरणास त्वरित अंतिम स्वरूप देण्याच्या सूचना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिल्यात. व्हीडीओ कॉन्फ्रंसीगद्वारे आज घेण्यात आलेल्या प्रदीर्घ बैठकीमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मार्च २०१८ पर्यंत सुमारे ५० हजार शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी रक्कमेचा भरणा केलेला आहे तर सुमारे १.५० लाख शेतकऱ्यांनी नवीन वीजजोडणीसाठी रितसर अर्ज़ भरलेले आहेत. परंतु, धोरणाअभावी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत राज्यातील शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत असून विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा होऊन लवकरात लवकर धोरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याअनुषंगाने ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी या विषयावर धोरण प्रस्तावित करण्याचे निर्देश दिले होते.
या प्रस्तावित धोरणामध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या कृषिपंपाना लघुदाब वाहीनीवरून तर १०० ते ६०० मीटर अंतर असलेल्या कृषिपंपाना उच्चदाब विद्युत वितरण प्रणालीवरून वीजजोडणी देण्यात येईल. याशिवाय ६०० मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येईल. एकाचवेळी पारंपरिक व सौरऊर्जा या अपारंपारिक स्त्रोताद्वारे वीजजोडणी देण्याचे धोरण आखण्यात...
मुंबई, दि.९: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार २२८ झाली आहे. आज ११६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना...