मुंबई, दि. ३ डिसेंबर २०२५ : नवरगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथील ७२ वर्षीय मथुरा ताई यांच्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीबाबत टाइम्स ऑफ इंडिया मध्ये...
विधानभवनामध्ये विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई, दि. ३ :- महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये पार पडणार आहे. विधिमंडळ...
पुणे, दि. ०३ : राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत (NSDC) इस्त्राईलमध्ये “नूतनीकरण बांधकाम” (Renovation Construction) या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील भरती प्रक्रिया सुरू झाली असून...
मता प्रतिष्ठान आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यामालेत मार्गदर्शन
पुणे: "जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल. मात्र, आधीच्या पिढीने संवादाची दारे उघडी ठेवावीत. सद्यस्थितीत तरुणांमधील वाढती बेकारी,...
पुणे-
पुण्यधाम आश्रमात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याने यंदाही मनाला स्पर्श करणारा अनुभव दिला. महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या 18 जोडप्यांनी, त्यापैकी 9 दृष्टिबाधित दांपत्यांनी, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी पूर्णतः निःशुल्क आणि विनादहेज आयोजित केलेल्या या सोहळ्यात एकमेकांच्या साथीने नवीन जीवनाची सुरुवात केली. हा उपक्रम सलग 10व्या वर्षी साजरा होत असून, आजतागायत 165 हून अधिक विनम्र कुटुंबातील कन्यांचे विवाह येथे थाटामाटात पार पडले आहेत।
सुमारे2500 हून अधिक लोकांच्या उपस्थितीत पुण्यधाम परिसर लग्नाच्या तयारीची धावपळ, शहनाईचे मंगल निनाद, फुलांची आकर्षक सजावट आणि सर्वत्र सणासुदीचे वातावरनात न्हाऊन निघाला
स्वर्णलाल साड्यांमध्ये दिमाखात सजलेल्या वधू आणि शेरवानी, फेटे व मोजडीमध्ये रुबाबदार दिसणाऱ्या वरांची बारात उत्साहात नाचत सोहळा स्थळी दाखल झाली। सुंदर सजवलेल्या मंडपात वर-वधू स्थिरावल्यानंतर विद्वान पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये विवाहविधी आरंभ केला। पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीतील अंतरपट, फेरे आणि कन्यादान यांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभाशीर्वादात संपन्न झाले।
पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा कृष्णा कश्यप म्हणाल्या:“पुण्यधाम आश्रम दरवर्षी अशा कन्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करतो, ज्यांच्या कुटुंबांना भव्य विवाह सोहळ्याचा खर्च उचलणे शक्य नसते। आमचे ध्येय म्हणजे या मुलींचे लग्न त्यांच्या स्वप्नांसारखे, कुटुंब-मित्रांच्या उपस्थितीत, सन्मानाने पार पाडणेतसेच दहेज प्रथेविरुद्ध जनजागृती घडवून समाजाच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवणे हा आमचा प्रयत्न आहे।”त्यांचे जीवनमंत्र: “मानव सेवेतूनच ईश्वर सेवा”
सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष सीए सदानंद शेट्टी, सचिव घनश्याम जावार, विश्वस्त गणेश कामठे, प्रसिद्ध समाजसेविका श्रीमती ममता सिंधुताई सपकाल, विजय सोनी, विश्वनाथ टोडकर, तसेच प्रतिष्ठित व्यक्ती महादेव बाबर, वीरसन जगताप, संगिता ठोसर, जलिंदर कामठे यांनी नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले।
विवाहविधी पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षा कृष्णा कश्यप, अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते नवविवाहित जोडप्यांना गृहस्थ जीवनाची सुरुवात सुखकर व्हावी यासाठी घरगुती साहित्य, डिनर सेट, कुकर, चादरी, नव्या साड्या, सलवारकमीज सेट इत्यादी भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले। “सर्व नवदांपत्यांना आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा — त्यांच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि एकोप्याचे चिरंतन आशीर्वाद राहोत” – मा. कश्यप
यापूर्वी याच उपक्रमातून विवाहबद्ध झालेले काही दांपत्यही या विशेष समारंभात सहभागी झाले होते हा दृश्य अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरला। सर्व पाहुण्यांसाठी पारंपरिक महाराष्ट्रीय जेवणाची स्वादिष्ट मेजवानीही आयोजित करण्यात आलीया भव्य आणि अत्यंत उदात्त सेवाकार्यातील संपूर्ण श्रेय कृष्णा कश्यप यांनाच जाते त्यांच्या सूक्ष्म नियोजनाशिवाय, अथक परिश्रमांशिवाय आणि प्रेरणेशिवाय पुण्यधाम आश्रमातील एकही उपक्रम शक्य नाही।