Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

७२ ब कलमाचे खेळणे करून पुढच्या पंचवार्षिक बजेटवरही पडतोय डल्ला

Date:

पुणे-तातडीची कामे या साठी असलेल्या ७२ ब कलमाचा गैरवापर करून पुढील पंचवार्षिक बजेटवर देखील डल्ला मारण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने चालविले असून प्रत्यक्षात या वर्षातील तातडीच्या कामांना ही हरताळ फासल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक, गटनेते आबा बागुल यांनी केला आहे. पुढील बजेट ची आताच पाळेमुळे कमकुवत करून ठेवल्याने पुढील पंचवार्षिक सत्रात त्या वेळेच्या प्रशासनाला आर्थिक टंचाईचा मोठा सामना करावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे .दरम्यान ६७ (३) क खाली गेल्या दोन वर्षात झालेल्या कामकाजाचा आढावा अद्याप महापालिकेच्या मुख्य सभेने जाहीररित्या घेतलेला नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे .

आबा बागुल म्हणाले कि, गेल्या पाच वर्षात पुण्याचा नागरी विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. असे असूनही सध्याचे सत्ताधारी भाजप 72 ब कलमाचा वापर करून मोठे मोठे प्रकल्प जाहीर करून कामाचा धूमधडाका सुरू आहे, ७२ ब कलमाचे पुणे महापालिकेत खेळणे केले आहे असे म्हंटले तरी वावगे होणार नाही.पुणे शहराच्या तातडीच्या प्रश्नांबाबत कोणतेही विकास कामे न करता अस्तिवात येण्याचा कालावधीबाबत साशंकता नसणारे हजारो कोटी रुपयांचे मोठे प्रोजेक्ट सुरू करण्याचे आश्वासन देऊन पुणे शहराची फसवणूक सत्ताधारी भाजप करत आहे.

यावर्षी पुणेकरांनी निवडून दिलेल्या सभासदांनी सुचविलेली कामांपैकी ३० टक्के कामे करण्यात येणार असून हि कामे १०० टक्के करण्यासाठी 72 ब कलमाचा वापर का केला जात नाही असा प्रश्न उभा राहत आहे. या कामांमधून पुणे शहराचा विकास होणार नाही का ? केवळ मोठ्या प्रकल्पातूनच विकास होणार आहे ? निवडणूक जवळ आलेली असताना पुण्याचे मूलभूत पायाभूत नागरी प्रश्न सोडविण्याकरिता 72 ब कलमाचा वापर करून त्यासाठी विकासाचा निधी खर्च का नाही करत असा प्रश्न सर्वसाधारण पुणेकरांना पडला आहे.

पुढील पंचवार्षिक मध्ये निवडून येणारी मुख्य सभा हि सध्याची ७२ ब कलमानुसार असलेली दायित्व स्वीकारणार आहे का ? याची जबाबदारी कोणाची ? पुढील पंचवार्षिक मध्ये बजेटमध्ये एकही नवीन विकासकाम घेता येणार नाही असे चित्र उभे होत आहे.

पुणे शहराच्या हद्दीत समाविष्ट झालेली अकरा गावे व आत्ताच नुकतेच समाविष्ट झालेली  23 गावे यांच्या विकासाचा देखील विचार सत्ताधारी भाजपने केला आहे काय? हा प्रश्न विचारावा वाटतो की तेथे देखील 72 ब चा वापर करण्यात येणार आहे याचा देखील खुलासा त्यांनी करावा. वास्तविक 11 गावांचा विकास आराखडा अजून तयार झालेला नाही तो देखील राज्य सरकार करणार की पुणे महानगरपालिका करणार हा देखील प्रश्न अधांतरीच आहे. अश्यातच 23 गावांचा समावेश नव्याने झाला असल्याने त्यांच्या विकास आराखड्याचे काय? तो कधी होणार कोण करणार? आणि त्यासाठी पुणे महानगरपालिका कोणत्या प्रकारचा निधी खर्च करणार मुळात असा निधी आहे काय? आणि मूळ पुणे शहराच्या विकासात बाधा न आणता या 11 व 23 गावांचा विकास करायला हवा अशी सर्वसाधारण भावना पुणेकरांमध्ये आहे ती योग्यच आहे. मग त्यासाठी 72 ब कलमाचा वापर करून 11 व 23 गावांमध्ये विकास कामे का सुरू केली जात नाहीत.

थोडक्यात कोरोना आणि महागाई पेट्रोल,डिझेल, गॅस दरवाढ, बेकारी अश्या विविध प्रश्नांनी गांजलेल्या पुणेकरांचे लक्ष नाही हे ध्यानात घेऊन 72 ब कलमाचा सर्रास वापर करीत पुण्याच्या तातडीच्या नसणारी कामे सत्ताधारी भाजप करीत आहे. याचे गौडबंगाल जनतेसमोर आले पाहिजे. विशेषतः 72 ब कलमाखाली अशी दीर्घकालीन कामे सुरू करताना तत्कालीन पुणे शहराच्या गरजांकडे दूर्लक्ष करणे हे पूर्णतः अयोग्य असून 72 ब कलमाखाली याही कामांची तातडीने सुरुवात करावी व पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षतर्फे मी करीत आहे. याकडे जर सत्ताधारी भाजपने लक्ष नाही दिले तर पुण्याच्या विकासाचा प्रश्न हाती घेऊन काँग्रेस पक्ष आंदोलन करेल असा इशारा आबा बागुल यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...