महाराष्ट्रातील भाऊबंदकी: उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत,म्हणाले .. राज ठाकरे….

Date:

बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी झाल्यानंतरही अनेकांना वारंवार वाटत होते ,उद्धव आणि राज या दोन भावांनी एकत्र यावे , वेळोवेळी दोघातल्या नातेसंबाधातील जिव्हाळ्याच्या गोष्टीदेखील चर्चिल्या गेल्या .पण काल झी २४ तास वर राज ठाकरे यांची ज्यांनी मुलाखत पहिली ,त्यानंतर अनेकांना या जिव्हाळ्या समवेत तेवढ्याच प्रमाणात महाराष्ट्रातील ,मराठी भाऊबंदकीच या दोहोत अजूनही नांदत असल्याचेच जाणवल्याशिवाय राहिलेले नाही .

”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही; तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. शिवसेनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. झी 24 तासचे संपादक निलेश खरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली यावेळी ते बोलत होते .

मी म्हटलं काका मला माहितीय तुझ्या मनात काय आहे.

माझ्या मनात कधीही शिवसेना त्याचा प्रमुख व्हावं अध्यक्ष व्हावं असं कधीच नव्हतं. मी बाळासाहेबांना याबद्दल पत्रं पण लिहिली होती. मी त्याही काळात फक्त एकच गोष्ट विचारत होतो की माझा जॉब काय?म्हणजे तुम्ही इतरांवर सगळ्या जबाबदाऱ्या टाकणार आणि मला फक्त निवडणुकीला भाषणासाठी बाहेर काढणार. मी ज्यावेळेला भाषण देतो त्यावेळेला मी एखाद्या गोष्टीला कन्व्हिन्स असतो. कन्व्हेक्शनने मी ते बोलत असतो. मी बोलल्यानंतर जर समजा ती गोष्ट झाली नाही सत्तेतनंतर मी पुढच्यावेळेला काय म्हणून जाऊन भाषण करायचं? म्हणजे मी दुसऱ्यांच्या जीवावरती मी माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. …उरला विषय समजा अध्यक्षपदाचा तर तो निर्णय बाळासाहेबांचा होता. बाळासाहेबांच्या मनात काय होतं मी बाळासाहेबांना महाबळेश्वरला सांगितलं. मी म्हटलं काका मला माहितीय तुझ्या मनात काय आहे. आम्ही अरे तुरे मध्ये बोलायचो….मी म्हटलं मला तुझ्या मनात काय आहे ते माहिती आहे. उद्धवला म्हटलं तू अध्यक्ष कर, माझी फक्त विनंती एवढीच आहे जाहीर मी करीन म्हणजे हा विषय बंद होईल. राज की उद्धव, हा विषय बंद होऊन जाईल. इतर कोणी जाहीर करायची गरजच नाही. 

”उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही; तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. यापूर्वी मनसे व शिवसेनेतील टाळीसंबंधीची कथित चर्चा झाली. पण उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. शिवनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

राज म्हणले की, सद्य:स्थितीत ‘मातोश्री’ संकटात असल्याचा दावा केला जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही. मातोश्री एक वास्तू आहे. त्यावर कोणतेही संकट नाही. वास्तू व संघटना वेगळी असते. सध्या संघटना म्हणजे शिवसेना लयास जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यामुळे सेनेत बंडखोरी झाली नाही. त्यांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टीव्हीवर येतात, अहंकारात काहीतरी बोलतात. ते तेवढ्यापुरते होते. त्यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नाहीत.

बाळासाहेबांच्या विचाराशी तेव्हा माणसे बांधील होती
राज ठाकरे म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हते. शिवसेकडे एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत माणसे एका विचाराने बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत एक विचार होता आणि त्या विचाराने माणसे बांधलेली होती.’ शिवसेनेची वाटचाल ऱ्हासाकडे सुरू झाली आहे. त्यामुळे हळहळ करण्यात अर्थ नाही.

बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा कुठेय ? इथे फक्त संपत्ती आणि सिम्पथी याचा विचार …

फडणवीसांना फुकटचे श्रेय नको; उद्धवमुळे शिवसेना फुटली
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी चांगले मित्र आहोत. मला भेटण्यासाठी फडणवीस घरी आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटले की, उगाच फुकटचे श्रेय तुम्ही घेऊ नका. त्यावर ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली ती ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शहा यांनी घडवली, ना भाजपने, ना अजून इतर कोणी घडवली. शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांना जाते. हे काही शिवसेनेमध्ये एकदा घडलेले नाही. आजपर्यंत अनेक मोठे नेते, आमदार बाहेर पडले, तेव्हा मी बाहेर पडलो होतो. तेव्हाची आणि आताचीदेखील कारणे एकच आहेत. या संपूर्ण गोष्टीला उद्धव जबाबदार आहेत, असे राज म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...