जयपूर-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मते, महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. येत्या मार्च पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे.भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनंतर आता नारायण राणे यांनी राज्यात भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे.मार्च पर्यंत राज्यात भाजपची सत्ता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अपेक्षित बदल दिसायला लागतील. सरकार पाडणे असो वा सरकार स्थापित करणे… या सर्व गोष्टी खूप सीक्रेट असतात. तरीही ही माझ्या मनातली गोष्ट असल्याने ती मी तुमच्यासमोर मांडत आहे. असे नारायण राणे म्हणाले आहेत.
नारायण राणे म्हणाले,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्च पर्यंत राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे सांगितले आहे. हीच गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत ठीक नाही. मी त्यावर काहीही बोलणार नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे नारायण राणेंनी सांगितले आहे.

