राज्यात 13 सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता- रावसाहेब दानवे

Date:

जालना -13 सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याचे रावसाहेब दानवेंनी वक्तव्य केले. जालना येथे विकास महामंडळांवर नव नियुक्त झालेल्यांचा समस्त ओबीसी समाजाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. तसेच ‘पुढच्या काळात मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

जालन्यात समस्त ओबीसी समाजाकडून पार पडलेल्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे उपस्थित होते. राजकारणात मराठा समाजाला देखील ओबीसीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. जालन्यात समस्त ओबीसी समाजाकडून विकास महामंडळांवर नवनियुक्त झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ओबीसी समाजाला संबोधित केले. ओबीसी समाजाने आमच्याकडे शत्रू म्हणून बघू नये आम्ही तुमचे मित्र आहोत. पुढील काळात आम्हालाही ओबीसीचा दर्जा द्या अशी मागणी करणार असल्याचे वक्तव्य दानवेंनी केले. सरपंचापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून झाली. आता कसलीही अपेक्षा राहिली नाही. पण मुख्यमंत्री पदाबाबत विचार करणार असल्याचे म्हणत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक वक्तव्य केले. दरम्यान 13 सप्टेंबरपासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“रंग रूप” भारतीय नाट्यशास्त्रावर होणार मंथन!

तीन दिवस राष्ट्रीय परिसंवाद: पुणे: सांस्कृतिक कार्य विभाग परिषद, महाराष्ट्र राज्य...

पुणेकर अनुभवणार शास्त्रीय नृत्यकलेचा अद्भभूत आविष्कार

नृत्यगुरु पंडिता रोहिणी भाटेंना ५०० पेक्षा जास्त नृत्यांगनांची आदरांजली २२-...

जिल्हा ग्राहक संरक्षण समिती बैठकीत केलेल्या सूचनांची प्रशासनाच्यावतीने दखल

प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश पुणे,...

डॉ. विश्वनाथ कराड हे लाल मातीतील कुस्ती जगविण्यासाठी प्रयत्नशील- हिंदकेसरी दीनानाथ सिंग

राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्धाटन पुणे, दि.२१ मार्च: "आधुनिक...