हे मोदी सरकार आहे, पाकमधून गोळी आली तर भारतातून गोळा टाकणार -नागपुरात अमित शहा

Date:

नागपूर – लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचार सभेला संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचे कौतुक केले. 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक आणि नुकताच दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करून साऱ्या जगाला मोदी सरकारने दहशतवादविरुद्धची भूमिका स्पष्ट केली. पाकमधून गोळी चालत असेल तर मोदी सरकारमध्ये भारतातून गोळा टाकला जाईल असे अमित शहा यांनी सांगितले आहे.

हवाई हल्ल्यानंतर देशात जल्लोष अन् राहुल गांधींच्या गोटात शोक -अमित शहा
नागपुरातील सभेला संबोधित करताना अमित शहा म्हणाले, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर काय करावे असा प्रश्न सर्वांना पडला होता. लोक सर्जिकल स्ट्राइकचे अंदाज लावत होते. पाकिस्तानने तर सीमांवर सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने सीमेवर रणगाडे तैनात केले होते. अशात मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने वेगळ्या पद्धतीने बदला घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी अतिशय नियोजित पद्धतीने एअर स्ट्राइक करण्यात आले. या हवाई हल्ल्यानंतर समस्त देशात नागरिकांनी जल्लोष साजरा केला. परंतु, दोन ठिकाणी शोक व्यक्त करण्यात आला. त्यापैकी एक म्हणजे, पाकिस्तान आणि दुसरे राहुल गांधी आणि मंडळी… मोदी सरकार सैनिकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या देशांसोबत शांतता चर्चा करणार नाही असे शहा यांनी स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...