Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भाजपा हिंदी भाषी महासंकल्प सभा-“कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे” ; फडणवीसांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा!“

Date:

मुंबई-कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टरसभा मास्टरसभा पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं लाफ्टर सभा लाफ्टर सभा. कौरवांची सभा काल झाली पांडवांची सभा आज होत आहे.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा साधला.मुंबई वेगळी करण्याचा मुद्दा असो की हिंदुत्व आणि बाबरी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने आज मुंबईत हिंदी भाषिकांची सभा घेतली या सभेत फडणवीस यांनी जोरदार निवडणुकीचे भाषण केले .मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कालची सभा ही लाफ्टर सभा होती, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे. मुंबईत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. कोरोना काळात मुंबईत भ्रष्टाचार झाला. काल कौरवांची सभा झाली आणि आजची सभा पांडवाची आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.शिवसेना आणि मुंबई मनपावर जहरी टीकायशवंत जाधवांची संपत्ती 35 हून 53 कोटींवर कशी गेली असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित करत मुंबई मनपात भ्रष्टाचार केला असा आरोप केला आहे. संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर डोक टेकवणे हा गुन्हा नाही का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. अयोध्येत त्यांचा एकही नेता नव्हता असा टोला त्यांनी पुन्हा लगावला आहे.बाबरी पाडायला गेलो होतो, सहलीला नाहीबाबरी पाडली याचा गर्व आहे. मात्र तिथे एकही शिवसैनिक नव्हता असा टोला पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माझ्यावर मुख्यमंत्र्यांचा खुप विश्वास आहे. बाबरी पाडायला गेलो होतो तेव्हा माझे वजन 128 किलो होते असे म्हणत माझे राजकीय वजन तुम्ही कमी करू शकत नाही असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.वाघांचे फोटो काढून वाघ होता येत नाहीकेवळ वाघांचे फोटो काढून वाघ होता येत नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गेली 2 वर्षे उद्धव ठाकरे कुठे होते. असे म्हणत वाघ हा भोळा असतो, आणि बाळासाहेब तसे होते. मात्र धूर्त कोल्हा कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर टीका केली आहे. देशात केवळ एकच वाघ आहे, असे सांगताना त्यांनी मोदीं हेच वाघ असल्याचे म्हटले आहे.खरे हिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदीच
घंटा बडवणारे नाही अतिरेक्यांना ठोकणारे हिंदुत्व भाजपचे आहे. म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये जात एअर स्ट्राईक केला. हिंदुत्वावरून फडणवीसांची ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी देशात खरा हिंदू केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत. असे म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.मुंबई वेगळी करायची आहेचमुंबई वेगळी करायचीच आहेच, मात्र ती केवळ यांच्या भ्रष्टाचारापासून दूर करायची आहे. ती महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कुणामध्ये नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मुद्दे नसले की मुंबई तोडण्याचा मुद्दा घ्यायचा हे शिवसेनेचे राजकारण सुरू आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. ठाकरे परिवार मुंबईचा बाप कसा झाला? असा सवाल त्यांनी केला आहे.आमच्यासोबत लग्न आणि संसार दुसऱ्यासोबतशिवसेनेने 5 वर्षे आमच्यासोबत संसार केला आणि संपत्ती घेऊन दुसऱ्यासोबत पळून गेले आणि दुसऱ्यासोबत संसार थाटला आहे. असे त्यांनी म्हटले आहे. आता लंकेचे दहन होणार असा मला ठाम विश्वास आहे. 2014 पूर्वी सामनात जे छापून येत होते ते खरे होते का हे शिवसेनेने सांगावे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विकासावर मुख्यमंत्र्यांचे एकही भाषण नाही म्हणत औरंगाबादचे नामांतर करण्यासाठी भाजप सत्तेत येण्याची वाट पाहावी लागेल असे म्हणत त्यांनी औरंगाबदच्या नामांतराचा मुद्दा भाजप मनपासाठी पुढे करणार असल्याचे जाहीरच केले आहे.मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणारगेली अनेक वर्षे मुंबई मनपामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार संपवत आम्हाला मुंबईला तुमच्या भ्रष्टाचारापासून दूर न्यायचे आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची मुंबई मनपावर सत्ता येणार असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांसाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी असे आवाीन त्यांनी आज केले आहे.विकासाला शिवसेनेकडून विरोध होतोय – शेलारराज्यात हनुमान चालिसा म्हणणाऱ्यावर गुन्हे दाखल होतात. मात्र औरंगजेबाच्या कबरीहून जाणाऱ्या लोकांवर मात्र गुन्हा दाखल होत नाही हे कसले हिंदुत्व म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेकडून अनेक प्रकल्पांना विरोध करण्यात येत आहे. आणि म्हणे हाताला काम जनतेच्या हाताला काम देण्याला शिवसेनेकडून होत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
राजकारणात सगळे पक्ष विचलित आहेत. कोणी संकल्प सभा करतय कोणी झेंडाचा रंग बदलतोय. सत्तेमध्ये बसललेल्यांना तर काहीच कळत नाही, सगळे विचलित आहे. कालची सभा पुचाट सभा होती आणि थू चाट सभा होती. म्हणचे थुंकून चाटणे म्हणजे थुचाट अशी गंभीर टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...