मुंबई, दि. १७ डिसेंबर – राज्यातील नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका या ओबोसी आरक्षणाशिवाय घेऊ नये अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त यु पी एस मदान यांची भेट देऊन केली.
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार आशिष शेलार या भाजपाच्या शिष्टमंडळाने आज मुख्य निवडणुक आयुक्त मदान यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले.
निवडणूक आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार एससी, एसटीच्या जागा सोडून बाकीच्या जागा जर खुल्या प्रवर्गातील असतील तर त्या जागांवर ओबीसींना अर्ज भरण्याची संधी मिळाली पाहिजे होती. फक्त त्या जागांच्या निवडणुका घेऊन बाकीच्या जागा आपण खुल्या प्रवर्गात करताना समान न्यायाचे तत्त्व दुर्लक्षित होते. इम्पेरीकल डेटा गोळा होईपर्यन्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक व्हावी, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे योग्य अर्थाने घ्यायचे असेल तर पूर्वीची निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुनः निवडणूक लावावी हे समान न्यायच्या तत्त्वाला अनुसरून होईल. त्यामुळे आमच्या मागणीचा न्यायपूर्वक विचार करावा अशी विनंतीही मुख्य निवडणुक आयुक्तांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
ओबीसी अरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत भाजपची मुख्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
Date:

