राज्यातील महाभारतामागे भाजपच; पुरेसे संख्याबळ नसल्याने फडणवीस गप्प – नाना पटोले

Date:

मुंबई-राज्यात सुरू असलेल्या राजकीय महाभारतामागे भाजपच असून, त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही; त्यामुळे ते गप्प आहेत. मात्र, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. गरज पडल्यास त्यांना बाहेरून पाठिंबाही देण्याची आमची तयारी आहे. महाविकास आघाडीत आम्ही आहोत आणि राहणारच अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली.पटोले म्हणाले, काँग्रेस महाविकास आघाडीत राहणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. भाजपने राज्यात सत्तासंघर्ष सुरु केला पण ते आजही समोर येत नाही. अजूनही आम्ही उद्धव ठाकरे सरकारच्या मागे आहे असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.पटोले म्हणाले, इडीचा धाक दाखवण्याचे काम भाजप करीत आहे. महाभारतामागे भाजप आहे, अजूनही भाजप शांत आहे त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यानेच ते गप्प आहेत. राज्यात अस्थिरता असेल तर जनतेचे नूकसान होत आहे हे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे.

नाना पटोले म्हणाले, राजकीय महाभारत शमायला हवे, अस्थिर व्यवस्थेत जनतेचे नूकसान होत आहे हे थांबावे ही काँग्रेसची भूमिका आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावरही चर्चा झाली. शिवसेनेत फुट पाडण्यासाठी भाजपचे कारस्थान सुरु आहे, हे वादळ शमवण्यासाठी संजय राऊत यांनी तसे वक्तव्य त्यांनी केले ते त्यांचे अंतर्गत वक्तव्य आहे असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले

काय म्हणाले अशोक चव्हाण?

भाजपला रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आले. त्यानंतर किमान समान कार्यक्रमानुसार या तीन पक्षांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये असून पुढेही राहील अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.सह्याद्रीवर काँग्रेसची बैठक सुरु आहे, बैठक झाल्यावर अशोक चव्हाण बाहेर आले तेव्हा त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी आपण महाविकास आघाडी सरकारमध्येच सहभागी आहोत आणि राहणारच अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...