नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत सरकार करणार फेरविचार-मुख्यमंत्री

Date:

रत्नागिरी- कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि ग्रामस्थांच्या विरोधानंतर हा प्रकल्प दुसरीकडे हलवण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते, पण राजापूरमधील हा उत्साह पाहून प्रकल्प पुन्हा आणावा वाटतोय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सुचक विधान केलं आहे.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सध्या कोकणात आहे. या यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. नाणार प्रकल्प कोकणात आणण्यास शिवसेनेचा विरोध असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या विधानाने शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

नाणारमध्ये येणारा प्रकल्प हा ग्रीन रिफायनरी आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. ज्या प्रकारे विरोध झाला, त्यामुळे आम्ही हा निर्णय थांबवला. पण हा उत्साह पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटते. आज मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला बोलावणार, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एक लाख रोजगार निर्मिती

आशिया खंडातील सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणात उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील नाणारमध्ये उभारण्यात येणार होता, पण विऱाधानंतर हा दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या प्रमुख तेल कंपन्या एकत्र येणार आहेत. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे एक लाख रोजगार निर्माण होण्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...