बाइक टॅक्सी प्रवासी सेवा- पुणे आरटीओला एग्रीगेर्टस परवान्यासाठी रॅपिडाेच्या अर्जावर पुर्नविचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Date:

पुणे-

बाइक टॅक्सी प्रवासी सेवा विनापरवानगी बेकायदेशीरित्या करत असल्याचे सांगत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) राेपेन ट्रान्सपाेर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (रॅपिडाे) कंपनी विराेधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. याप्रकरणी रॅपिडाे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितल्यानंतर, उच्च न्यायालयाने पुणे आरटीओने जारी केलेली नाेटीस बाजूला ठेवली आहे.

तसेच न्यायालयाने पुणे आरटीओला एग्रीगेर्टस परवान्यासाठी रॅपिडाेच्या अर्जावर पुर्नविचार करण्याचे निर्देश दिलेले आहे. अशी माहिती रॅपिडाेचे वकील अमन दत्त यांनी गुरुवारी दिली आहे.

रॅपीडाेच्या वतीने मुंबई उच्च न्यायलया समाेर आरटीओ पुणे आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या अंर्तगत इतर प्राधिकरणां विरुध्द दाखल केलेल्या रिट याचिका दाखल केली. कारण पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रॅपिडाेचे ऑपरेशन हे बेकायदेशीर असल्याचे घाेषित करणारा आदेश पारित केला आणि रॅपिडाेला पुण्यातील ऑपरेशन्स बंद करण्याचे र्निदेश दिले. त्यानंतर रॅपिडाेचे संचालक जगदीश पाटील यांचे विराेधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. रॅपिडोच्या वतीने देशभरातील 22 राज्यात सध्या सेवा पुरवण्यात येत असून पुण्यात 57 हजार बाईक टॅक्सी कॅप्टन नेमण्यात आले आहे.

मुंबई शहरासह एकूण दोन लाख रायडर्स कॅप्टनची सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे. पुणे आरटीओच्या निर्णयामुळे रॅपिडाे कंपनीच्या रायडर्सवर पोलिसांकडून बेकायदेशीर कारवाई केली जात असल्याचा दावा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 21 एप्रिल 2022 ला दिलेल्या आदेशानुसार बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना त्यांची सेवा पुरवण्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

मात्र, अशा परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय होईपर्यंत सेवा देता येऊ शकेल. असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केलेले आहे. मात्र, तरीही आरटीओकडून बेकायदेशीर कारवाई केली जात असल्याचा आरोप दत्त यांनी केला आहे.

दत्त म्हणाले, रॅपिडो कंपनी मोठ्या प्रमाणात बाईक टॅक्सीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करत आहे. मात्र, पुण्यातील रिक्षा संघटनांच्या संपाच्या दबावामुळे आरटीओने आमच्यावर कारवाई केली आहे. रीक्षा संघटनेचे एक नेते ‘माय रिक्षावाला’ ही कंपनी स्थापन करून आमच्यासारखी सेवा देत आहेत आणि तरीसुद्धा आमच्यावर कारवाईची मागणी करतात. रॅपिडाेच्या ज्या रायडर्सवर कारवाई करण्यात येते, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून यासंदर्भात न्यायालयीन लढा आम्ही आगामी काळात लढून न्याय मिळवू.असे देखील ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले .... पुणे- गेली...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...