Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पांडुरंगाहूनी मोठ्ठा मोदींचा फोटो …

Date:

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता रविकांत वर्पे यांनी घेतली हरकत

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 जून रोजी प्रथमच देहू नगरीत येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू संस्थान प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. भाजपनेदेखील पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठीची जय्यत तयारी केली आहे. मात्र, भाजपकडून मोदींच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.दरम्यान मोदींच्या दौऱ्यामुळे देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.सुरक्षेच्या दृष्टीने उद्या सकाळी ८ ते १४ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंदिर बंद असणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.

मोदींच्या स्वागतासाठी भाजपकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोदींचा फोटो मोठा लावण्यात आला आहे.या संदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता रविकांत वरपे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे.”

भाजपने लावलेले हे पोस्टर काढून टाकावे आणि विटेवरी उभा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. भाजपाने वारकरी संप्रदायाची माफी मागावी अशी मागणी देखील वारकरी संप्रदायाने केली आहे.

दोन दिवसांपूर्वी डीजी रजनीश सेठ यांनी पोलीस पथकासह देहूतील शिळा मंदिर, मुख्य मंदिर परिसराला सुरक्षेच्या कारणास्तव भेट दिली होती. त्याठिकाणची पाहणी करण्यात आली. देहूतील शिळा मंदिर, मूर्तीचा लोकार्पण होताच देहूपासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंडी, वारकरी, नागरिक उपस्थित राहणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधानांचे तुकाराम पगडी आणि अभंग लिहिलेल्या उपरण्याने स्वागत केलं जाणार आहे. देहू संस्थांनच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी ही तुकाराम डिझायनर पगडी साकारली आहे.

या पगडीबाबत गिरीश मुरुडकर म्हणाले की, आजवर आमच्यामार्फत अनेक राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि कला क्षेत्रातील मान्यवर मंडळीकरीता पगडी, फेटे तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूला देहू दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकरिता पगडी आणि उपरणे तयार करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही मागील तीन चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करीत आहोत. पुढील काही तासात ते काम पूर्ण होईल. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. पगडीच्यावरील बाजूस तुळशीची माळ, चिपळी, टाळ आणि पगडीच्या एका बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची छोटीशी प्रतिमा लावली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...

पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झालाय -माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

पुणे- पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाल्याचा दावा...