पुणे-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून सर्वांनी उच्च शिक्षित होऊन संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याची गरज असल्याचे मत सिंहागडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी नऱ्हे येथील नवदीप सोसायटी मध्ये अभिवादन सभेत व्यक्त केले.
या वेळी झालेल्या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी नवदीप सोसायटीचे चेअरमन विष्णु कदम होते.
व.पो. नि. देविदास घेवारे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब ढाकणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नऱ्हे आंबेगाव विभाग प्रमुख राज कदम यांनी केले होते.
हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती भुमकर, प.स.सदस्या ललिता कुटे,ग्रा. प.सदस्या सुप्रिया भुमकर,प्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वंदना कदम, राजु कुटे,दयानंद लोखंडे, रणजित माने, मस्तान जाधव, दशरथ राजगुरू, विशाल वाघमारे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन अविनाश गायकवाड, आनंद लोखंडे, किरण शिरसाट, विशाल ओव्हाळ, अजय मळेकर, प्रतीक कदम, अमित कदम व नवदीप मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.
सूत्रसंचालन दशरथ राजगुरू यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज-वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे
Date:

