Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘बिन देखे पडे नही चैन’ या भैरवीने ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता

Date:

संगीतातील बदलात कलाकार आणि श्रोते यांचे महत्त्वाचे योगदान – डॉ. प्रभा अत्रे

पुणे: ” भारतीय संगीत आज जागतिक मंचापर्यंत पोहचले म्हणूनच कलेकडे सुद्धा डोळसपणे पहिले पाहिजे. काळानुरूप काही गोष्टीवर उलट विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. कलाकार आणि श्रोते या दोघांची ही जबाबदारी आहे आणि आपण ती चांगली पार पडली आहे,” अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या कालच्या समारोपाच्या सत्रात डॉ. अत्रे यांनी स्वरमंचावरून श्रोत्यांशी संवाद साधला. 
” मी किराणा घराण्याची आहे, याचा मला खूप अभिमान आहे. उस्ताद करीम खान यांच्यापासून भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी संगीतास समृद्ध केले आहे,”  असे सांगत डॉ. अत्रे म्हणाल्या, ”  संगीत हे केवळ शास्त्र नाही, कसरत, करामत अथवा मनोरंजन नाही, तर या जगातील सुंदर, मंगल शाश्वत जे आहे, त्याची जाणीव करून देणारा माध्यम आहे. संगीत परंपरेत काळानुरूप जे बदल झालेत, ते बदल शास्त्र आणि विज्ञानाच्या कसोटीवर तपासून, त्याप्रमाणे मी बदल करत आले आहे. त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. पण त्यामध्ये नव्याने विचार सुरू होईल, अशी मला  खात्री आहे.”  

भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारात सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सवाचे मोठे योगदान आहे,असेही त्यांनी सांगत त्यांनी राग भैरवी’ने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यामध्ये तराणा व ‘जागी मै सारी रैन’, ‘जगत जननी भवतारी मोहिनी तू नवदुर्गा…’ ठुमरी सादर केली.
त्यांना सुयोग कुंडलकर ( हार्मोनियम ), माधव मोडक (तबला), आरती ठाकूर – कुंडलकर, आश्र्विनी मोडक ( तानपुरा), डॉ.चेतना बनावट व अतींद्र तरवडीकर ( गायन) यांनी साथ केली.

तत्पूर्वी महोत्सवाच्या पाचव्या दिवशी उत्तरार्धातील दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध कथक नृत्यांगना व अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांनी आपल्या भावस्पर्शी कथक सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या ‘श्रीराम स्तुती’ने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कथक सादरीकरणासोबतच त्यांची ऊर्जा, हावभाव यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर रूपक तालात सात मात्रा, धमार तालमध्ये १४ मात्रा, २ स्वरचित रचना, चक्रधार पढंत त्यांनी सादर केल्या. धीरगंभीर अशा ‘श्रीराम कथा’ सादरीकरणाने त्यांनी आपल्या प्रस्तुतीचा समारोप केला. त्यांना झुबेर शेख ( सतार ) , पं. कालिदास मिश्रा ( तबला ) वैभव मानकर ( हार्मोनियम व गायन),  वैभव कृष्ण (पढंत) , भुवन ( बासरी) यांनी साथ केली.

महोत्सवाच्या परंपरेप्रमाणे सवाई गंधर्व यांच्या ‘बिन देखे पडे नही चैन’ या भैरवीचे रेकॉर्डींग ऐकून ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता करण्यात आली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...