‘ अर्थचक्रा’ साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : डॉ. भागवत कराड

Date:

पुणे-
करोनाच्या संकटाला न घाबरता बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी धैर्याने तोंड देत माणुसकी जपत ‘अर्थचक्र’ सुरू ठेवले. त्यामुळे करोनाच्या काळात डॉक्टर, नर्सेस, पोलिस यासह बँक कर्मचऱ्यांनी दिलेले योगदान महत्वाचे असून ते विसरता येणार नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी बँक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
करोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता बँक कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘आरोग्यम् धनसंपदा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. कराड यांच्या हस्ते विविध बँक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे अकॅडमी फॉर अँडव्हान्स स्टडीज् आणि बँक कर्मचारी संघ पुणे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे हा कार्यक्रम झाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपचे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे, एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे, नगरसेवक धीरज घाटे, शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष एस.के. जैन, बँक कर्मचारी संघाचे सरचिटणीस बापू मानकर यावेळी उपस्थित होते.
आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी चालू वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यासाठी दोन लाख ३४ हजार कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आल्याचे अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. करोनाच्या संकटात भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘सेवा ही संघटना ‘ या माध्यमातून काम केल्याचेही ते म्हणाले. करोनाच्या काळात ग्राहकांशी एकरूप होऊन बँक कर्मचाऱ्यांनी काम केले, अशा बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे, असे खासदार बापट यांनी आपल्या मनोगतात सांगितले. बँक कर्मचाऱ्यांचे काम अद्वितीय आहे. अनेक घटकांनी या काळात योगदान दिले आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. करोनाच्या आजारामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात शासकीय, सहकारी बँक, पतसंस्थेतील तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी, दीपक नागपुरे यांनी स्वागत केले. तर आभार बापू मानकर यांनी मानले.

Oooooooooo

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...