पवारांच्या घरावरील हल्ला : गुणरत्न सदावर्तेना पोलिसांनी घेतले ताब्यात : 107 आंदोलक अटकेत

Date:

मुंबई-राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्याप्रकरणी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. पवारांच्या घरावरील हल्ल्याशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्या घरी काही वेळापुर्वी पोलिस पोहचले त्यानंतर त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांची चौैकशी केली. चौकशीनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गुणरत्न सदावर्तेच्या भाषणामुळे शरद पवारांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला असे पोलिसांचे म्हणणे आहे पोलिसांनी क्लिप पाहिल्यानंतरच सदावर्तेवर कारवाई केल्याचे स्पष्ट केले . 107 आंदोलकांच्या स्टेटमेंटमधून महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रात्री सदावर्तेंना अटक करण्यात आली आहे.
चिथावणीखोर भाषण कुणी दिले? – उपमुख्यमंत्री

आंदोलकांची दिशाभूल झाल्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाने जे काही सांगितले ते परबांनी केले. संपात गुलाल उधळला पेढे वाटले आणि आज पवारांच्या घरासमोर लोक आले. कशामुळे हे घडले, कुणी चिथावणीखोर भाषण दिले असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पोलिस ठाण्यात होणार चौकशी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर सदावर्ते सातत्याने शाब्दिक वार करीत होते. या हल्ल्याचा कट त्यांनी आखला का याची चौकशीही केली जाणार आहे.

गृहमंत्र्यांनी सांगितले होते की, यामागे सूत्रधार कोण आहेत याचा आम्ही शोध घेऊ. पवारांच्या घरावर आंदोलन करणारे सर्व आंदोलकच होते, त्यात एकही नेता नव्हता. आंदोलनात नेता नाही असे होऊ शकत नाही असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. त्या धर्तीवर गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी झाली असून त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शरद पवार बदला घेत आहेत – जयश्री पाटील

पोलिस घरात घुसले त्यांनी गुणरत्न सदावर्तेंना घेऊन गेले. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांना कर नाही त्याला डर काय असे म्हणाल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले. तर मी बेडरूममध्ये होते तेव्हा कपडे बदलत होते, महिला पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. असे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना शरद पवार बदला घेत आहेत असा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. तर माझ्या जीवाला, माझ्या पतीच्या आणि मुलांच्या जीवाला धोका आहे असे वक्तव्य जयश्री पाटील यांनी केले आहे. माझा खून झाला, तर दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असे वक्तव्य पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे.

माझ्या पतीला काही झाले तर पवार जबाबदार – जयश्री पाटील

सरकारची दादागिरी, सरकारचा जुलुम आहे. माझ्या पतीच्या जीवाला काही झाले तर शरद पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असेही जयश्री पाटील यांनी सांगितले. कोणतीही नोटीस न देता बेकायदेशिररित्या त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.