रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर चे उद्घाटन

Date:

  • मुंबई मध्ये प्रथमच रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर चे उद्घाटन
  • अनेक फायदे रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळतात
  • रुग्णांना माफक दरात अधिक चांगल्या सुविधा मिळ्तील व शस्त्रक्रियेनंतर चा त्रास ही कमी होतो

मुंबई-उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई मध्ये एका पाठोपाठ २ रोबोटिक च्या माध्यमातून सांधेरोपण शस्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये ६५ वर्षाच्या कांचन पाटील या ५ वर्षापासून गुधगेदुखीच्या त्रासाला सामोरे जात होत्या.मात्र गुढघ्यावर झालेल्या  नॅव्हीओ पीएफएस रोबोटिक्स सर्जिकल च्या माध्यमातून त्या शस्त्रक्रियेच्या चार तासाच्या आत चालू देखील लागल्या.

रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रिये पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे. या रोबोटिक असिस्टेड शस्रक्रियेत अधिक अचूकता, कमीत कमी रक्तस्राव, लवकरात लवकर बरे होण्याची खात्री आणि बदललेल्या कृत्रिम सांध्यात मिळणाऱ्या नैसर्गिक हालचाली असे अनेक फायदे रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांना मिळतात. “रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण शस्रक्रिया ही पारंपारिक शस्त्रक्रिये पेक्षा नक्कीच फायदेशीर आहे.” असे प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आणि उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे ऑर्थोपेडिक्सचे प्रमुख डॉ. तेजस उपासनी म्हणाले. ते पुढे म्हणाले की“मानवी क्षमतेच्या त्रुटी रोबोटिक च्या साह्याने दूर करणे व रुग्णांना सर्वोत्तम रिझल्ट देणे शक्य झाले आहे. हे अतिशय प्रगत असे तंत्रज्ञान आमच्या रुग्णालयात उपलब्ध आहे. ज्यामुळे रुग्णांना माफक दरात अधिक चांगल्या सुविधा मिळ्तील व शस्त्रक्रियेनंतर चा त्रास ही कमी होतो”

उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई येथे रोबोटिक सांधेरोपण शस्रक्रिया सेंटर चे उद्घाटन श्री. अतुल कुलकर्णी, अभिनेते यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी श्री अतुल कुलकर्णी म्हणाले कि, “वैदकीय क्षेत्रातील या महत्वाचा बदलाने आयुष्य वाढवले आहे, हे विज्ञानाची सिद्धी आहे वैदकीय शास्त्रात झालेली प्रगती व नव-नव्या सोयी व उपकरणांमुळे  मोठ मोठ्या आजारांवर आळा घालण्यास मदत होते”.

जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामांमुळे या रुग्णांचे नातेवाईक अत्यंत आनंदी आहेत, या शस्त्रक्रिये नंतर रुग्ण २-३ दिवसात घरी जाऊ शकतो. मानवी क्षमतेच्या त्रुटी रोबोटिक च्या साह्याने दूर करणे व रुग्णांना सर्वोत्तम रिझल्ट देणे शक्य झाले आहे, शस्रक्रियेनंतर रुग्ण अधिक समाधानी व आत्मविश्वासपूर्वक चालू  शकतात. एक-दोन दिवसातच स्वतः घरी चालत जाऊ शकतात, यामुळे रुग्णालयात राहण्याचा अतिरिक्त खर्च देखील कमी होतो, तसेच वेदना खूपच कमी झाल्याने वेदनाशामक औषधांचा वापर कमी होतो. रुग्ण स्वतःच हिंडू/ फिरू शकल्याने शस्रक्रियेनंतर फिजिओथेरपीची आवश्यकता भासत नाही.  एकूणच, रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी एक वरदानच ठरले आहे.

उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे ऑर्थोपेडिक आणि नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ.तेजस उपासनी व सेठ जी.एस मेडिकल कॉलेज चे माझी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी  यांच्या पुढाकाराने रोबोटिक तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे.

या वेळी सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज चे माजी विभाग प्रमुख डॉ. विनोद लाहिरी, म्हणाले, “रोबोटीक टेक्नोलॉजी च्या साहाय्याने कमी वेळात पेशंटस् ना कृत्रिम भाग बसवणे जास्त  फायदेशीर आणि अचूक होत आहे. यामूळे कृत्रिम भाग दीर्घयुष्यी झाले. मुंबई मध्ये रोबोटीक टेक्नोलॉजी कृत्रिम भाग बसवण्याची ही सुविधा उपलब्ध झाल्या व त्याचबरोबर  उपासानी सूपर स्पेशालीटी हॉस्पिटल च्या सर्जनच्या योग्य हातात आहे याचा मला आनंद आहे.”

जेव्हा डॉ. तेजस उपासनी ना विचारले की त्यांनी ही टेक्नोलॉजी का निवडली, ते म्हणाले, “आम्ही USSH मध्ये नेहमी पेंशटंस् ना चांगलंच देण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही नेहमी पेशटंच्या सुरक्षतेवर व चांगल्या परिणामांवर  लक्ष केंद्रित करतो.”

या प्रसंगी रुग्ण म्हणाले कि “ या शस्त्रक्रिये नंतर माज्या वेदना पूर्णपणे कमी झाल्या आहेत, याचा मला आनंद आहे. आणि  रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण शस्रक्रिया ही मला अतिशय लाभदायक ठरली.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यभरात हरवलेल्या ४८ हजार २७८ पैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश

मुंबई- राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन...