विश्वनाथन आनंद खेळले एकाचवेळी बारा विद्यार्थ्यांबरोबर बुद्धीबळ

Date:

  • या स्पर्धेत ५ ते १६ या वयोगटातील स्पर्धकांचा सहभाग
  • अंतिम फेरीसाठी ४८६ पैकी १२ विद्यार्थांची निवड
  • स्पर्धेच्या प्रथम बारा स्पर्धकांना रोख बक्षीस, पारितोषिक व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले.

पुणे-एडिफाय इंटरनॅशनल स्कूलने पुणे जिल्हा चेस असोसिएशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी एक अनोख्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी आपली हजेरी लावली. या स्पर्धेची खासियत अशी होती की अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या १२ विद्यार्थ्यान बरोबर विश्वनाथन आनंद यांनी बुद्धिबळचा सामना खेळला. हा खेळ एडिफाय इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

या स्पर्धेत ५ ते १६ या वयोगटातील एकून ४८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेची प्रारंभिक फेरी ही दि. १७ व १८ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आली होती. अंतिम १२ स्पर्धकांनमध्ये अद्वैत पाटील, कशिष जैन, शिवराज पिंगळे, जेल दिगंबर, निर्गुण केवल, प्रेम मेहेत्रे, साहिल ढोबळे, युवराज पाटील , सिंगला आर्यन, धीरेन मोर, अथर्व बागुल, छवी बाफना यांचा समावेश होता.

यावेळी मिडियाशी बोलताना विश्वनाथन आनंद म्हणाले की “ मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की एडिफाय इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थांच्या कौशल्यपूर्ण खेळाला वाव देत आहे. अभ्यासा प्रमाणाने खेळालाही तेवढेच महत्व देणे गरजेचे आहे, तरच त्यात उत्तम यश नक्की मिळेल.” त्याच बरोबर ते म्हणाले की “ प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देणे आवश्यक आहे तसेच बुद्धिबळात आणि आयुष्यात यश व अपयश पचवण्याची ताकद निर्माण केली पाहिजे.”

शाळेच्या मुख्याधापिका प्रिया आनंद म्हणाल्या की “अंतिम १२ स्पर्धकांना  विश्वनाथन आनंद यांच्या बरोबर बुद्धिबळ खेळण्याची खूप मोठी संधी मिळाली. यातून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, विश्वनाथन यांच्या कडून मिळालेल्या टिप्स स्पर्धकांना आयुष्यभर नक्कीच उपयोगी पडतील हा मला विश्वास आहे.”

त्याच बरोबर पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे अध्यक्ष जोसेफ डिसूझा म्हणाले की, “या स्पर्धेत सहभाग झालेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी होती स्पर्धकांना विश्वनाथन आनंद यांच्या कडून बुद्धिबळाच्या खेळातील विविध  टिप्स व प्रेरणा मिळाली.”

या वेळी विश्वनाथन आनंद यांच्या हस्ते एडिफाय इंटरनॅशनल स्कूलच्या आयबी अभ्यासक्रमाचे उद्घाटन झाले तसेच त्यांच्याच हस्ते बुद्धिबळ स्पर्धेच्या प्रथम बारा स्पर्धकांना रोख बक्षीस, पारितोषिक व प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम बारा स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे आहेत, कशिष जैन, शिवराज पिंगळे , जेल दिगंबर , निर्गुण केवल , अद्वैत पाटील , प्रेम मेहेत्रे, साहिल ढोबळे, युवराज पाटील, सिंगला आर्यन, धीरेन मोर, अथर्व बागुल, छवी बाफना. या बारा स्पर्धकांना पुढील प्रमाणे बक्षीस प्रदान करण्यात आली. (१) १०,०००/-  (२) ६,०००/- (३) ४,०००/-  (४) २,५००/-  (५) २,५००/-  (६) २,०००/-  (७) २,०००/- (८) २,०००/- (९) २,०००/- (१०) २,०००/- (११) पारितोषिक व प्रशस्तिपत्रक (१२) पारितोषिक व प्रशस्तिपत्रक.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजीव बर्वे व प्रियंका बर्वे यांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

अभंग-गवळणींच्या सुरांनी जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवात रंगली भक्तीमय मैफल पुणे...

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सदानंद अंचवल स्मृती पुरस्कारांचे वितरण

विद्यार्थ्यांवर भारताला ‘जगाचे गुरुस्थान’ मिळवून देण्याची जबाबदारी – पांडुरंग...

शासन व्यवस्थेचा अंकुश न राहिल्यानेच भोंदूगिरीचे प्रस्थ वाढले-गोपाळदादा तिवारी

पुरोगामी महाराष्ट्रात, ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ काँग्रेस ने केला.. मात्र...

आरटीई कायद्यात सुधारणा करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

पुणे  : राईट टू एज्युकेशन ॲक्ट, 2009 मध्ये आवश्यक...