विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी केली घोषणा: आमदारकीचा राजीनामा देणार

Date:

चित्रपट गृहातील मारहाण प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्याने याप्रकरणी मुंब्रो पोलिसांकडे तक्रार केली आहे. गुन्हा दाखल होताच आव्हाडांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली आहे.

खोटे गुन्हे दाखल केले

जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी माझ्याविरुद्ध 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल केले आहे, तेही कलम 354चे. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. मी या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार आहे. मी माझ्या लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही.

ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात काल रात्री आव्हाडांविरोधात भाजप महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. काल मुंब्रा येथे उड्डाणपुलाच्या उद्घाटन सोहळ्यातच ही घटना घडल्याचे भाजप महिला पदाधिकाऱ्याने म्हटले आहे.

महिलेचा नेमका आरोप काय?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते काल ठाण्यात दोन उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रथम कळवा पूल व त्यानंतर मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित भाजप महिला पदाधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि महिला पदाधिकारी आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. या घटनेबाबत महिला पदाधिकाऱ्याने आरोप केला की, आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलले.

घटनेनंतर भाजप महिला पदाधिकाऱ्याने मुंब्रा पोलिस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनीही तातडीने तक्रारीची दखल घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे संतापलेल्या जितेंद्र आव्हाडांनी 72 तासांत पोलिसांनी माझ्याविरोधात दोन खोट्या केसेस दाखल केल्या. लोकशाहीची हत्या बघू शकत नाही. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली.

शनिवारीच मिळाला जामीन

हर हर महादेव चित्रपटाला विरोध करण्यासाठी चित्रपटगृहात धुडगूस व प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. या प्रकरणातून दिलासा मिळत नाही तोच जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आता विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. पोलिस आता याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...