28 फेब्रुवारी पर्यंत, युक्रेनमधून 1156 भारतीय मायदेशी

Date:

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय तसेच गृह मंत्रालयाच्या निकट सहकार्याने युक्रेनमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी शक्य ते सर्व सहकार्य करत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अनिवार्य आंतरराष्ट्रीय प्रवास मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले असून मानवतावादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील सवलतींना परवानगी दिली आहे:-

  • सध्याच्या ‘भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये’ नमूद केल्यानुसार अनिवार्य आवश्यकता (प्री-बोर्डिंग निगेटिव्ह RT-PCR चाचणी अहवाल किंवा संपूर्ण लसीकरण प्रमाणपत्र) पूर्ण करत नसलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी प्रस्थानापूर्वी ही कागदपत्रे एअर -सुविधा पोर्टलवर अपलोड करण्यातून सूट देण्यात आली आहे.
  • तसेच, ज्या व्यक्तींनी त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण केले आहे (प्रस्थान/लसीकरण केलेला देश कुठलाही असो) त्यांना आगमनानंतर पुढील 14 दिवसांसाठी त्यांच्या आरोग्यावर स्वतः देखरेख ठेवण्याच्या सूचनेसह विमानतळ सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • जर एखादा प्रवासी आगमनापूर्व आरटी पीसीआर चाचणी अहवाल सादर करू शकत नसेल किंवा ज्यांनी त्यांचे कोविड-19 लसीकरण पूर्ण केले नसेल, त्यांना 14 दिवस त्यांच्या आरोग्याची स्वत: तपासणी करण्याच्या सूचनेसह भारतात आगमनानंतर त्यांचे नमुने सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतात आल्यानंतर  चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास निर्धारित प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय नियमांचे त्यांना पालन करावे लागेल.

युक्रेनमधील राजकीय संकटात भारतीय वंशाच्या नागरिकांचा मोठा समुदाय अडकला आहे. युक्रेनमध्ये जारी करण्यात आलेल्या नोटिस टू एअरमन किंवा नोटिस टू एअर मिशन्स (NOTAM) च्या पार्श्वभूमीवर या अडकलेल्या भारतीयांना थेट विमान सेवेद्वारे तिथून बाहेर काढता येत नाही. त्यामुळे पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी येथील भारतीय दूतावास ऑपरेशन गंगा फ्लाइट्स अंतर्गत युक्रेनमधून आणि त्यांच्या संबंधित देशांमधून भारतीय नागरिकांना परत पाठवण्याची व्यवस्था करत आहेत.

28 फेब्रुवारी 2022 पर्यंत (12:00 वाजेपर्यंत), युक्रेनमधून भारतीयांना घेऊन येणारी 5 विमाने भारतात (एक मुंबईत आणि चार दिल्लीत) आली आहेत, ज्यात एकूण 1156 प्रवासी असून आतापर्यंत एकाही प्रवाशाला अलगीकरणात ठेवलेले नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...