पुणे – जागतिक महामारीच्या काळात आपल्या देशाच्या ‘हॉटस्पॉट ‘वर लढलेला महायोद्धा अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाचे कौतुक करत अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी हि कोरोना काळात केलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करून कदम यांनी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुरु केलेल्या लोकोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन केले . यावेळी त्यांनी अजितदादा यांना लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असे संबोधित आगामी महापालिकेच्या निवडणूक संग्रामात आपणही महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारू असेही सूचित केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसा चे औचित्य साधून नगरसेविका अश्विनी कदम आणि पर्वती विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नितीन कदम यांनी आपल्या थेट जनसंपर्क आभियांच्या अंतर्गत सर्व शासकीय दाखले नागरिकांना मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला त्याचे उद्घाटन आणि कदम दाम्पत्यांच्या महा इ सेवा केंद्राचे उद्घाटन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले .
यावेळी तहसीलदार तृप्ती कोलते पाटील आणि राष्ट्रवादी चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .नगरसेविका अश्विनी कदम यांनी यावेळी आपल्या मतदारसंघातील कामाचा आढावा घेतला .उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे आपण कोरोना काळात देखील लोकोपयोगी सेवा देऊ शकल्याचे सांगितले.यावेळी पर्वती विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष नितीन कदम म्हणाले कि,’ अनेक नागरिकांना वेळोवेळी विविध शासकीय दाखल्यांची गरज लागते आणि वेळेवर मग त्यांची तारांबळ उडते काही समाज कंटक त्यांच्या वेळेचा फायदाही घेतात , नागरिकांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कधी कधी फसगत हि होते हे होऊ नये म्हणून जेव्हा नागरिकांना गरज असेल तेव्हा त्या त्या शासकीय दाखल्यांसाठी नागरिक येथे येऊ शकतात आणि मोफत त्यांना त्यांचे दाखले काढून देण्याचे काम येथून केले जाईल . महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाने, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिक आवश्यक असणाऱ्या सेवांचा अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरून आवश्यक व उपलब्ध त्या सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय प्राप्त करू शकणार आहेत. यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाबाबतीत मानसिक समाधानव वेळेची बचत होऊन दिलासा प्राप्त होणार आहे.

