Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सरकारने राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल यांचा गांभीर्याने विचार करायला हवा -अजित पवार

Date:

पुणे:वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे.वेदांता चा प्रकल्प गुजरात मध्ये गेला .त्यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं सांगितलं.मात्र आता एअर बस प्रकल्प गुजरात ला गेला.अशावेळी आधीच्या सरकारने काय केलं, या सरकारने काय केलं याविषयी आरोप प्रत्यारोप करत बसण्या पेक्षा राज्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल यांचा गांभीर्याने विचार आवश्यक करायला हवा.

असे राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रवक्तेप्रदीप देशमुख, खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले,प्रकल्प कुणाच्या नाकर्ते पणामुळे जाताहेत का?एका राज्यात येऊ घातलेले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात यात काही राजकारण आहे का? हे सरकारने या बघितले पाहिजे.असे पवार म्हणाले.
मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना यंदाची दिवाळी साजरी करता आली नाही, कारण पावसामुळे त्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकाचे सोयाबीन, कापूस नुकसान झाले होते”, असे पवार यांनी म्हटले‌आहे.
अजित पवार म्हणाले,कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नातेवाईकांसह कोणालाच भेटता आले नाही. मात्र, यंदा जोरदार दिवाळी साजरी करण्यात आली. परंतु, दिवाळी साजरी केली असली, तरी एका गोष्टीचे दु:ख आहे, ते म्हणजे राज्यात मुसळधार

पावसामुळे निर्माण झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. आजही अनेक शेतकरी चिंतेत आहेत, काही जण आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाबाबत मी दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. असे अजित पवार म्हणाले.

भाजप नेत्याच्या कार्यक्रमात वाजलं राष्ट्रवादीचं गाणं वाजल आहे. पुण्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमासाठी भाजप नेत्याची एन्ट्री झाली आणि डीजेवर राष्ट्रवादीचं गाणं सुरु झालं.यामुळे सकगळेच जण गोंधळून गेले. तात्काळ हे गाण बंद करण्यात आले. यानंतर पोलिसांनी या कार्यक्रमासाठी साऊंड सिस्टीमची अरेंजमेंट करणाऱ्या डीजेला ताब्यात घेतले.अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जर कार्यक्रमात राष्ट्रवादीच गाणं वाजलं तर बिघडलं कुठं? कधी कधी एखाद्या कार्यक्रमात होतं एवढ त्याला महत्व देण्याची गरज नाही असे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सत्तार यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर टीका करतानाच ठाकरे घराण्यावरही जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना पप्पू म्हटलं, ही आपली संस्कृती आहे आहे का?असा सवाल अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांना उपस्थित केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...