अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार असल्याच्या वृत्ताने खळबळ
नवी दिल्ली-आज बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला दिल्लीतील ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते. ऐश्वर्या दिल्लीतील लोकनायक भवन येथील ईडी कार्यालयात दुपारी दोन दरम्यान कार्यालयात हजर झाली होती. त्यानंतर तिची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली असून, ईडीची चौकशी संपली आहे.जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांना या चौकशीला सामोरे जावे लागल्याचे समजते आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी तयार केली होती. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. या नेत्यांमध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या लोकांवर करचुकवेगिरीचा ठपका असल्याचे समजते आहे. याबाबत कर अधिकारी तपास करत आहेत.
महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही तपासात झाला आहे सामिल
पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या प्रकरणात महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार आहे
बच्चन कुटुंबाचे नाव का?
2016 मध्ये, ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे 11.5 कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. या 1993 मध्ये तयार करण्यात आल्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते, परंतु या कंपन्या त्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्यांची किंमत कोट्यावधी होती.ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर तिला कंपनीची शेअर होल्डर डिक्लेयर करण्यात आले. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. त्याचे मुख्यालय व्हर्जिन आयलँड्सवर होते. ऐश्वर्याव्यतिरिक्त वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली होती.

