एअर इंडियाने मुंबई व सॅन फ्रांसिस्को दरम्यान आपली पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरु

Date:

ही विमानसेवा आठवड्यातून तीन वेळा उपलब्ध असणार आहे

भारत-यूएस दरम्यानच्या विमानसेवेची वारंवारता दर आठवड्याला ४० नॉन-स्टॉप विमानांपर्यंत वाढवली जाणार.

नवी दिल्ली१६ डिसेंबर२०२२: भारतातील आघाडीची एअरलाईन आणि स्टार अलायन्समधील एक सदस्य, एअर इंडियाने १५ डिसेंबर २०२२ पासून मुंबई आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान पहिली नॉन-स्टॉप सेवा सुरु करून युनायटेड स्टेट्समध्ये आपले पंख अजून जास्त विस्तारले आहेत. २ डिसेंबर २०२२ रोजी एअर इंडियाने बंगलोर आणि सॅन फ्रांसिस्कोदरम्यान आठवड्यातून तीनदा विमानसेवा सुरु केली होती, त्यानंतर लगेचच ही मुंबईहून सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे.  जगाच्या नकाशावर जास्तीत जास्त सेवाविस्तार करण्याच्या आणि आपल्या ग्राहकांना उच्चतम दर्जाच्या सेवा व सुविधा पुरवण्याच्या एअर इंडियाच्या व्हिजनला अनुसरून ही नवी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रवासाचे मुख्य केंद्र मुबई बनावे यासाठीचे प्रयत्न एअर इंडियाने सुरु ठेवले आहेत. मुंबई-सॅन फ्रांसिस्कोनंतर मुंबई-न्यूयॉर्क सिटी (जेएफके), मुंबई-फ्रँकफर्ट आणि मुंबई-पॅरिस हे रूट देखील सुरु केले जातील. मुंबईहून देशांतर्गत विमानसेवांची व्याप्ती व संख्या देखील वाढवली जाईल.

नव्याने भरती करून घेण्यात आलेल्या बोईंग ७७७-२००एलआर एअरक्राफ्टचा यामध्ये वापर केला जाईल आणि दर आठवड्याला मंगळवार, गुरुवार व शनिवार अशा तीन दिवशी मुंबई-सॅन फ्रांसिस्को विमानसेवा उपलब्ध असेल. सध्या एअर इंडियाच्या नॉन-स्टॉप विमानसेवा मुंबई ते नेवार्क, दिल्ली ते न्यूयॉर्क, नेवार्क, वॉशिंग्टन डीसी, सॅन फ्रांसिस्को आणि शिकागो, बंगलोर ते सॅन फ्रांसिस्को या मार्गांवर उपलब्ध आहेत. दिल्ली आणि बंगलोरनंतर मुंबई हे भारतातील तिसरे शहर आहे जिथून सॅन फ्रांसिस्कोसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

मुंबई ते सॅन फ्रांसिस्को या मार्गावरील पहिले विमान एआय १७९ मुंबईहून १४३० वाजता निघून त्याचदिवशी १७०० (स्थानिक वेळ) या सुविधाजनक वेळी सॅन फ्रांसिस्कोला पोहोचले. परतीचे विमान एआय१८० सॅन फ्रांसिस्कोहुन २१०० (स्थानिक वेळ) वाजता निघून मुंबईला ०३४० वाजता पोहोचेल + दोन दिवस.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. ज्योतिरादित्य एम सिंधिया आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे हे विमानसेवेच्या व्हर्च्युअल उदघाटन समारंभामध्ये उपस्थित होते. नागरी विमान वाहतूक विभागाचे सचिव श्री. राजीव बन्सल आणि एअर इंडियाचे फायनान्स चीफ श्री. विनोद हेजमाडी यांच्यासह त्यांनी या विमानाला हिरवा झेंडा दाखवला.

विमानसेवेचा शुभारंभ पवित्र दीपप्रज्वलनाने करण्यात आला, त्यानंतर केक कापण्यात आला, रिबन कापण्यात आली. एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी श्री कॅम्पबेल विल्सन यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोर्डिंग गेटवर चेक इन करत असलेल्या पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास सुपूर्द केला. यावेळी एअर इंडिया, मुंबई विमानतळ आणि इतर कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रवासी उपस्थित होते. रिबन कापण्याच्या प्रसंगी विमानातील दोन सर्वात ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. ज्योतिरादित्य एम सिंधिया यावेळी म्हणाले, “आज महाराष्ट्रभारत आणि एअर इंडिया यांच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक दिन आहे. भारतामध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत आणि भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक बाजारपेठ आहे. गेल्या तीन वर्षात भारताने १०.६% सीएजीआरची वाढ नोंदवली आहे.  याआधी देखील एअर इंडियाने या क्षेत्रातील परिवर्तनामध्ये लक्षणीय भूमिका बजावली आहे आणि यापुढे देखील त्यांचे योगदान कायम राहील. एअर इंडियाचा वारसासंस्कृती आणि व्हिजन यांच्यासह ही एअरलाईन भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाईल.”

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले, “महाराष्ट्रातील जनतेसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण एअर इंडियाने महाराष्ट्र व सॅन फ्रांसिस्को दरम्यानचे अंतर मिटवून टाकले आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावरमहाराष्ट्रात अजून अनेक ठिकाणी अजून जास्त विमानतळेहेलिपॅड्स उभारण्यावर सरकारचा भर आहे. मुंबईहून एअर इंडियाने सेवेचा शुभारंभ केला याचा मला अतिशय आनंद आहे.  इथून जगातील आणि देशातील इतर अनेक ठिकाणी विमानसेवा सुरु केल्या जाण्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.”   

एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी श्री कॅम्पबेल विल्सन यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले, “विहान.एआय या आमच्या पंचवार्षिक परिवर्तन योजनेचा एक भाग म्हणूनभारतातील प्रमुख शहरे आणि जगभरातील प्रमुख डेस्टिनेशन्स यांच्यात कनेक्टिव्हिटी लक्षणीय प्रमाणात सुधारावी अशी आमची योजना आहे.  भारताची आर्थिक राजधानी आणि सिलिकॉन व्हॅली यांच्या दरम्यान नॉन-स्टॉप विमानसेवा हे ग्राहकांना सुधारित अनुभव प्रदान करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.  हा मार्ग सुरु करण्यात आल्यामुळे आमच्याकडे दर आठवड्याला ४० नॉन-स्टॉप विमानसेवा उपलब्ध आहेतज्यामुळे यूएसएसोबत भारताच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल.

मुंबई ते सॅन फ्रांसिस्को दरम्यानच्या पहिल्या विमानातील प्रवाशांना एअर इंडियाच्या वतीने विशेष तयार करण्यात आलेल्या गुडी बॅग्स स्वागतपर भेट म्हणून देण्यात आल्या. 

अधिक माहितीसाठी प्रवाशांनी www.airindia.in याठिकाणी लॉग ऑन करावे किंवा आमच्या बुकिंग ऑफिसेसशी किंवा तुमच्या ट्रॅव्हल एजंट्सशी संपर्क साधावा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...