अखेर काँग्रेसचाच घात-विधानपरिषद निकाल जाहीर

Date:

भाजपाने बाजी मारली, राष्ट्रवादी,सेनेने गड राखले .

काँग्रेसच्या एकाचा विजय तर एकाचा पराभव

मुंबई -संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विधानपरिषदेच्या 10 व्या जागांसाठी 11 उमेदवार उभे होते.काँग्रेस चे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले.संख्याबळ नसताना देखील भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी त्यांचा पराभव केला. हाती भाजपने विजय मिळवला.

काँग्रेसच्या भाई जगताप यांचा विजय झाला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजें निंबाळकर, एकनाथ खडसे शिवसेनेचे आमशा पाडवी आणि सचिन अहीर, भाजपचे श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खापरे, आणि प्रवीण दरेकर यांचा विजय झाला. ही सर्व मते पहिल्या पसंतीची होते.

काँग्रेसचे भाई जगताप ,चंद्रकांत हंडोरेआणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात खरी काटे की टक्कर होती. अखेर यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत हंडोरे यांचा पराभव केला. आणि काँग्रेसचे भाई जगताप एकटे विजयी झाले, महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच या निकालामुळे महाविकास आघाडीत एकी नाही हे दिसून आले.काँग्रेसला एकाकी पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले.काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील मते नेमकी किती ,कुणाची फुटली यावर आता मंथन होईल पण महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम असती तर भाजपाच्या पाचव्या उमेदवाराला मते गेली नसतीआणी काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून आला असता, या विचाराने आता राज्यातील आघाडी सरकारमध्ये काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागून राहणार आहे .

भाजपाचे सगळे नेते विजयाचा आनंद साजरा करत आहेत. किंगमेकर फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेते विजयी जल्लोष साजरा करत आहेत

भाजपला पहिल्या पसंतीची तब्बल १३३ मत पडले आहेत. राष्ट्रवादीला एकून ५७ मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादीला एकून ६ अपक्षांची मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्याही पहिल्या पसंतीची ३ मतं फुटली आहेत. दरम्यान भाजपला अधिकची २७ मतं मिळाली आहेत.

विजयी उमेदवार

भाजप-

1. प्रवीण दरेकर –

2. राम शिंदे –

3. श्रीकांत भारतीय

4. उमा खापरे

5. प्रसाद लाड

शिवसेना –

1. सचिन अहिर

2. आमसा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस-

1. रामराजे निंबाळकर
2. एकनाथ खडसे

काँग्रेस-

1. भाई जगताप

दरम्यान काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचं मान्य केलं आहे. दरम्यान शेवटच्या क्षणाला काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला यासंदर्भात आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे.काँग्रेसने आपले आमदार फुटल्याचं मान्य केलं आहे. काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे तर भाई जगताप विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीतील आमचे मत फुटल्याचं माध्यमांना बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या कारणावरून त्यांनी फुटलेल्या आमदारांबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.काँग्रेसकडील त्यांचे स्वत:चे तीन मत फुटल्याचं समोर आलं आहे. तर शिवसेनेचे तब्बल १२ मत फुटल्याचं समोर आलं असून थोरातांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अकरा उमेदवारांपैकी काँग्रेसच्या हंडोरेंचा पराभव झाला आहे

राष्ट्रवादीची चाणाक्ष खेळी, राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेत सर्व जागा राखल्या

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा चाणाक्ष खेळी केली आहे. राष्ट्रवादीने आपले दोन्ही उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना अगदी पद्धतशीपणे निवडून आणलं. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील सर्वात सुरक्षित आणि चाणाक्ष पक्ष म्हणून समोर आला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले ,

विधान परिषदेच्या निवडणूकीत पाचही उमेदवार निवडून आले आहेत, आम्ही राज्यसभेच्या निवडणूकीत आम्ही १२३ मते घेतली होती आता १३४ मते घेतली आहेत असे त्यांनी सांगीतले. महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी आहे, सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीये म्हणून आमदारांनी आम्हाला मते दिली असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हतं, तरीही आम्ही कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली असे फडणवीस यावेळी म्हणाले. या निकालानंतर महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी पाहायला मिळाली असे ते म्हणाले, या सरकारच्या विरोधातील असंतोष समोर आला आहे, यापुढे असाच संघर्ष सुरू राहील आणि लोकाभिमुख सरकार आणल्यानंतरच तो थांबेल असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.