गोदरेज रेफ्रिजरेटरने सलग तिसऱ्या वर्षी जिंकला केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीचा ‘मोस्ट एनर्जी एफिशंट अप्लायन्सेस ऑफ द इयर’ पुरस्कार

Date:

मुंबई: गोदरेज अप्लायन्सेस या भारतातील होम अप्लायन्सेस श्रेणीतील एका आघाडीच्या कंपनीने RD Edge Pro 190 PDS INV 5.2 मॉडेलसाठी ‘नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकला आहे. ऊर्जाक्षमतेसाठी बाजारात आघाडी घेणाऱ्या आणि वर्षभरात ऊर्जाबचतीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या ऊर्जाक्षम अप्लायन्सेसना नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्डने गौरवले जाते. सलग तिसऱ्या वर्षी या ब्रँडने रेफ्रिजरेटर श्रेणीतील नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्ड (गोल्ड) पटकावला आहे आणि गोदरेज ऊर्जाक्षमता क्षेत्रामध्ये आघाडीवर असल्याचे अधोरेखित केले आहे.

समृद्ध जगण्याच्या आमच्या आश्वासनाच्या अनुषंगाने, गोदरेज अप्लायन्सेसने ग्राहकांना पर्यावरणपूरक, ऊर्जाक्षम अप्लायन्सेस देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. एज प्रो इन्व्हर्टर रेंज ही देशातील आजची सर्वात ऊर्जाक्षम सिंगल डोअर डायरेक्ट कूल रेंज असून, त्यामुळे ग्राहकांना 10 वर्षांच्या कालावधीमध्ये 3-स्टार रेफ्रिजरेटरपेक्षा अधिक, 9300 रुपयांहून अधिक बचत करण्याची संधी मिळणार आहे.

पुरस्काराविषयी बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी सांगितले, “बीईईसारख्या प्रतिक्षित संस्थेकडून आणि सलग तीन वर्षे हा पुरस्कार मिळाला, ही अत्यंत आंनदाची बाब आहे. रेफ्रिजरेटर असो किंवा एअर कंडिशनर असो, कंपनीच्या अप्लायन्सेसमधील कार्यक्षमता वाढवण्यासाठी गोदरेजने सातत्याने केलेल्या प्रयत्नांची ही पोचपावती आहे. गोदरेज ही सीएफसी-मुक्त रेफ्रिजरेटर, ग्रीनेस्ट एअर कंडिशनर्स व ग्रीन उत्पादन अशा चांगल्या व ग्रीन उत्पादनांद्वारे अप्लायन्सेसच्या क्षेत्रामध्ये प्रवर्तक व संशोधक म्हणून प्रसिद्ध आहे. आम्ही ऊर्जाक्षमतेच्या बाबतीत नवे विचार मांडतो आणि दरवर्षी कार्यक्षमतेचे बेंचमार्क निर्माण करत आहोत. सोच के बनाया है या आमच्या ब्रँडच्या विचारसरणीनुसार आम्ही भविष्यातही यामध्ये सातत्य ठेवणार आहोत.”

पुरस्कार स्वीकारताना गोदरेज अप्लायन्सेसचे रेफ्रिजरेटर्स – प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, “सलग तिसऱ्या वर्षी रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये ‘नॅशनल एनर्जी कॉन्झर्व्हेशन अवॉर्ड’ हा पुरस्कार जिंकल्याचा आम्हाला अतिशय आनंद व अभिमान वाटतो. एज प्रो रेंजने सिंगल डोअर रेफ्रिजरेटर श्रेणीमध्ये आमचे स्थान सक्षम होण्यासाठी मदत झाली आहे. देशात विकल्या जाणाऱ्या रेफ्रिजरेटरमध्ये या श्रेणीचे योगदान 77% आहे. ट्रेड व त्यासारख्या ग्राहकांनी या उत्पादनांचे जोरदार स्वागत केले आहे. या उत्पादनांचे उत्तम डिझाइन व उच्च कामगिरी यांचे हे प्रतिक आहे. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व त्यांना आनंद देण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. गोदरेज Edge Pro 190 PDS INV 5.2 मॉडेल हा या दिशेने केलेला आणखी एक प्रयत्न आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...