हॅलोने युजर्सबरोबर साजरा केला किसान दिवस

Date:

  • शेतीशी संबंधित कण्टेण्ट पोस्ट करून शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम दर्शवण्यासाठी युजरना उत्तेजन
  • उपमुख्यमत्री, शेती मंत्री व कायदा मंत्री अशा तामिळनाडूतील मान्यवरांनी या कॅम्पेनमध्ये घेतला सहभाग

 नवी दिल्ली: देशातील ‘अन्नदातां’चा न संपणारा उत्साह व प्रेरणा यांना सलाम करत, हॅलो या भारतातील सर्वात मोठ्या प्रादेशिक सोशल मीडिया सुविधेने किसान दिवसाच्या निमित्ताने  #सॅल्युटटूफार्मर्स / #किसानों को सलाम ही विशेष कॅम्पेन दाखल केली आहे. या विशेष कॅम्पेनच्या निमित्ताने, हॅलो भारतातील शेतकऱ्यांची दखल घेणार आहे व त्यांचा गौरव करणार आहे. ही कॅम्पेन हॅलोच्या 50 दशलक्षहून अधिक युजरना शेतीशी संबंधित कण्टेण्ट पोस्ट करून, शेतकरी करत असलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानून शेतकऱ्यांबद्दलचे प्रेम व पाठिंबा दर्शवण्यासाठी उत्तेजनही देते.

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओट्टकरातेवर पन्नीरसेल्वम, तामिळनाडूचे शेती व पशुपालन मंत्री आर. दोराईक्कण्णू व कायदा मंत्री सी. व्ही. षण्मुगम या मान्यवरांसह 11,000 हून अधिक हॅलो युजर्सनी शेतकऱ्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी #सॅल्युटटूफार्मर्स या कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला.

हॅलोच्या कण्टेण्ट ऑपरेशन्सचे हेड श्यामंगा बरुआह यांनी मते व्यक्त करताना म्हटले: “आमच्या वैविध्यपूर्ण युजर्सबरोबर किसान दिवस साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि या कॅम्पेनद्वारे मोठा #सॅल्युटटूफार्मर्स निर्माण करायचा आहे. हॅलो अर्थपूर्ण कॅम्पेनद्वारे लोकांच्या जीवनात मूल्य निर्माण करत असते आणि समाजाच्या कल्याणासाठी हॅलो केअर प्रकल्प दाखल करून आम्ही या दिशेने यापुढेही प्रयत्न करत राहणार आहेत.

हॅलो समुदायाने शेतकऱ्यांचे कौतुक करत, आजवर 14 भारतीय भाषांमध्ये 28,000 हून अधिक पोस्टची निर्मिती केली आहे. हॅलो केअर या हॅलोच्या कम्युनिटी सबलीकरण उपक्रमांतर्गत दाखल करण्यात आलेली ही कॅम्पेन युजर्सकडून भरभरून प्रतिसाद व प्रेम मिळवत आहे. #सॅल्युटटूफार्मर्सवर सातत्याने सहभागी होणारे व अत्यंत लोकप्रिय असलेले असे 10 पर्यंत युजर्स निवडून त्यांना कॅम्पेनदर्याम हॅलो गिफ्ट बॉक्स दिले जातील.

शेतकरी हे भारताचा कणा असल्याने त्यांचा गौरव करण्यासाठी, दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन किंवा किसान दिवस देशभर उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय शेतकऱ्यांचे नेते व भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती असते.

हॅलो केअरने असे अनेक उपक्रम राबवले आहेत. या प्रयत्नांतून, भारतातील वैविध्यपूर्ण समुदायाच्या कल्याणासाठी व सबलीकरणासाठी हॅलोने केलेली बांधिलकीही अधोरेखित होते.

 

हॅलो केअरविषयी:

हॅलो केअर हा हॅलो या भारतातील आघाडीच्या सोशल मीडिया सुविधेचा सामाजिक सबलीकरण उपक्रम आहे. या उपक्रमामुळे प्रत्येकाला शिक्षण, संस्कृती, समाज व स्वच्छता यावर केंद्रीत विषयांसाठी स्वयंसेवा करण्याची संधी मिळते. गरज असणाऱ्या व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने, सेलिब्रेटी, मतांवर प्रभाव घडवणारे, निर्माते व सामाजिक संस्था यांना एकत्र आणून या विषयांना पाठिंबा दिला जातो.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...

मराठा ना जरांगेंचा,ना बारामतीकरांचा: संभाजी भिडे गुरुजी यांचे प्रतिपादन

रोटरी मराठी साहित्य संमेलनात भिडे गुरुजींशी अभिनेते शरद पोंक्षे यांचा संवाद पुणे : मराठा ही संज्ञा जातीवाचक नाही. जो महाराष्ट्रात जन्मला, मराठी भाषेचा अभिमानी आहे, मराठी भाषाच बोलतो, त्याला मराठा म्हणायचे, या अर्थाने महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस मराठा आहे, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे गुरुजी यांनी रविवारी सायंकाळी येथे केले. हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा नेमका अर्थ जाणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासा, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांना संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते रोटरी व्होकेशनल ॲवार्ड प्रदान करण्यात आले. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि शाल, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रांतपाल संतोष मराठे, डिस्ट्रिक्ट व्होकेशनल डायरेक्टर प्रसाद गणपुले, संमेलनाच्या कार्याध्यक्ष मधुमिता बर्वे,  संयोजन समितीच्या सोनाली चौबळ तसेच पूनम महाजन आदी यावेळी उपस्थित होत्या. पुरस्कार वितरणानंतर पोंक्षे यांनी संभाजी भिडे गुरुजींशी संवाद साधला. जरांगे पाटील उच्चस्वरात बोलतात, तो मराठा नाही आणि बारामतीच्या आसपासची मंडळी जे बोलतात, तोही मराठा नाही, असे सूचक वक्तव्य करून भिडे गुरुजी म्हणाले, इस्लामी, ब्रिटिश आणि अन्य आक्रमकांनी आपल्या भाषेवरही आक्रमण केले. त्यामुळे मराठी भाषेतील सुमारे ४८ टक्के शब्द परकीय आहेत. आपल्या मायमराठी भाषेच्या शरीरात अनेक परकीय भाषेतील शब्दांचे बाण घुसले आहेत. त्यामुळे भाषाशुद्धी आधी केली पाहिजे. छत्रपतींनी राजव्यवहारकोषाची निर्मिती यासाठी केली होती, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शिवछत्रपती नेमके समजले होते. शिवाजी महाराजांनी मुघलांच्या बाबतीत, त्यांना जी भाषा समजते, त्याच भाषेत सदैव उत्तर दिले, तोच इतिहास आपण आज जागा केला पाहिजे. विकृत शिवचरित्रे नष्ट करा सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अनेक विकृत, अवास्तव पद्धतीने पुढे आणले जात आहे. हा धोका ओळखून, शिवछत्रपतींचे अस्सल चरित्र आपल्या आणि आपल्या पिढ्यांसमोर ठेवले पाहिजे. वि. का. राजवाडे, शेजवलकर, वा, सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींवर केलेले लेखन अभ्यासले पाहिजे. स्पष्ट, स्वच्छ विधानांचे विकृत अर्थ लावणारी पत्रकारिताही निषेधार्ह आहे, असे भिडे गुरुजींनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी शिवछत्रपतींचे मातापिता – शहाजीराजे आणि जिजाऊ यांचे चरित्र, धारणा समजून घेतल्या पाहिजेत. हिंदवी स्वराज्य निर्मितीचे स्वप्नबीज, शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्या माता-पित्यांकडून आले आहे, इतकी त्यांची चरित्रे आणि कर्तृत्व महत्त्वाचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे. हिंदू इतिहासाला मराठ्यांशिवाय अर्थ नाही. कशासाठी जगावे आणि मरावे, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले. स्वराज्य भोसल्यांचे नव्हे तर हिंदवी होते, सर्वसामान्यांसाठी होते. सध्या मात्र राजा कालस्य कारणम्, या न्यायाने चित्र बदलले आहे. मात्र, महाराष्ट्र सध्या योग्य अशा नेतृत्वाच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. समारोप समारंभ भिडे गुरुजी यांच्या...